महाराष्ट्र

राज्यातील रिक्षा, टॅक्सीचालकांना दिलासा

Swapnil S

मुंबई : परवाना नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रति दिन आकारले जाणारे ५० रुपये शुल्क माफ करण्याची घोषणा मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो रिक्षा, टॅक्सीचालकांना दिलासा मिळाला आहे.

रिक्षा, टॅक्सीच्या परवान्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. परवाना नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रति दिन ५० रुपये शुल्क आकारले जाते. परवाना नूतनीकरणास एक दिवस विलंब झाला तर आकारले जाणारे ५० रुपये शुल्क माफ करावे, अशी मागणी रिक्षा, टॅक्सी संघटनांनी लावून धरली होती. तसेच रिक्षा, टॅक्सीचालकांनीही राज्य सरकारकडे शुल्क माफ करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. मोटार वाहन अधिनियमानुसार कायदेशीर तपासणी करून शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दादा भुसे यांनी विधानसभेत जाहीर केले.

परवाना नूतनीकरण विलंब शुल्क माफ केल्याने राज्यातील लाखो रिक्षा, टॅक्सीचालकांना दिलासा मिळणार आहे, असेही भुसे यांनी नमूद केले.

Mumbai : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ‘बेस्ट’ आयडिया! आता CNG विकणार; २७ डेपोंत प्रकल्प राबवणार

कोल्हापूर -पुणे 'वंदे भारत' आजपासून; आठवड्यातून ३ दिवस धावणार, बघा वेळापत्रक

‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी भेदभाव; दोन वकिलांची मुंबई पोलिसांकडे तक्रार

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवठ्यात निवडणुका; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत, महायुतीचे जागावाटप आठवडाभरात पूर्ण!

गणरायाच्या विसर्जन सोहळ्यासाठी BMC सज्ज; ६९ नैसर्गिक स्थळांसह, २०४ कृत्रिम विसर्जनस्थळांची व्यवस्था