(संग्रहित छायाचित्र) 
महाराष्ट्र

मुंबई ते विदर्भ अजून सुसाट! समृद्धी महामार्गाचा होणार विस्तार; 'या' तीन जिल्ह्यांना फायदा

महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय...

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणाऱ्या समृद्धी महामार्गाचा चंद्रपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. समृद्धी महामार्गाच्या विस्तारासाठी नियोजित तीन महामार्गांच्या निविदा प्रक्रियेला इन्फ्रा कंपन्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ४६ निविदा प्राप्त झाल्या आहेत.

राज्य सरकारने समृद्धी महामार्ग चंद्रपूर, गोंदिया आणि भंडाऱ्यापर्यंत नेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार समृद्धीचा तीन महामार्गाच्या माध्यमातून विस्तार केला जाणार आहे. यात नागपूर-चंद्रपूर महामार्गासाठी २२ निविदा प्राप्त झाल्या आहेत. नागपूर-चंद्रपूर हा १९४ किलोमीटरचा महामार्ग सहा टप्प्यात तयार केला जाणार आहे. या महामार्गाच्या विविध टप्प्यांसाठी अँफकाँन इन्फ्रा, जीआर इन्फ्रा, एनसीसी, माँटेकार्लो, गवार कन्स्ट्रक्शन, एचजी इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा, पटेल इन्फ्रा, बीएससीपीएल इन्फ्रा या कंपन्यांनी निविदा सादर केली आहे.

समुद्धीच्या विस्तारात नागपूर, गोंदिया या १६२ किलोमीटरच्या महामार्गाची उभारणी केली जाणार आहे. हा महामार्ग चार टप्प्यात तयार केला जाणार असून यात अँफकॉन इन्फ्रा, जी. आर. इन्फ्रा, माँटेकार्लो, एनसीसी, अँपको इन्फ्रा, जीआर इन्फ्रा, पीएनसी इन्फ्रा, ओरिएंटल स्ट्रक्चरल इजिनिअरींग अशा कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत.

समृद्धी महामार्गाला भंडारा गडचिरोलीपर्यंत महामार्गाच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. हा महामार्ग १४२ किलोमीटर इतका लांबीचा आहे. यासाठी गवार कन्स्ट्रक्शन, जी.आर इन्फ्रा, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स, पटेल इन्फ्रा या कंपन्यांनी निविदा सादर केली आहे. तांत्रिक निविदांमध्ये कंपन्यांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता समृद्धीच्या विस्ताराचे काम लवकरच सुरु होण्याचा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. समृद्धी महामार्गाच्या विस्ताराने विदर्भातील इतर जिल्ह्यांमधील विकासाला चालना मिळणार आहे.

Mumbai: कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना लवकरच दिलासा; १५ डब्यांच्या लोकलबाबत खूशखबर

Mumbai : मोदींच्या उपस्थितीत NESCO मधील इव्हेंटदरम्यान टॉयलेटमध्ये बेशुद्ध पडले होते माजी ऑस्ट्रेलियन मंत्री; तातडीच्या मदतीने वाचला जीव

तरुणांच्या विवाह योगात बिबट्यांचे विघ्न; दहशतीमुळे पुणे जिल्ह्यात विवाहेच्छुक तरुणांना मुली मिळेनात

‘४२ कोटींची वसुली नोटीस कशासाठी?’ मुंढवा जमीन प्रकरणात महसूलमंत्र्यांचे आश्चर्य; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

Mumbai : नॅशनल पार्कमधील अतिक्रमित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी जागा शोधा; उच्च न्यायालयाचे आदेश