महाराष्ट्र

राज्य सरकार १८ सप्टेंबरला बांबू धोरण जाहीर करणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधत १८ सप्टेंबरला राज्य सरकार बांबू पॉलिसी जाहीर करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.‌

Swapnil S

मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून बांबूच्या झाडांची लागवड करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाचे जगभरातून स्वागत केले जात असून आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधत १८ सप्टेंबरला राज्य सरकार बांबू पॉलिसी जाहीर करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.‌

नरिमन पॉइंट येथील एनसीपीए सभागृहात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री सामंत म्हणाले.‌ मंत्रालय विधी मंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटेनियो गुटेरस यांनी वातावरण बदलाबद्दल सगळ्या जगाला अपील केले आहे. तापमान वाढीचे युग संपले असून होरपळ युग सुरू झाले आहे. या त्यांच्या आवाहनाला जगभरातून भारत देशाने आणि भारतामध्ये महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यासाठी पहिले पाऊल टाकले, असे सामंत म्हणाले.

UPI शुल्कावर GST? पात्र व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भार

कृषी उत्पन्न बाजार समित्या रोजगारनिर्मितीचे केंद्र बनवणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

Thane : शासकीय रुग्णवाहिकांची डिझेलसाठीची धावपळ थांबणार! 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्डमुळे इंधनाची अडचण दूर होणार