महाराष्ट्र

राज्य सरकार १८ सप्टेंबरला बांबू धोरण जाहीर करणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधत १८ सप्टेंबरला राज्य सरकार बांबू पॉलिसी जाहीर करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.‌

Swapnil S

मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून बांबूच्या झाडांची लागवड करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाचे जगभरातून स्वागत केले जात असून आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधत १८ सप्टेंबरला राज्य सरकार बांबू पॉलिसी जाहीर करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले.‌

नरिमन पॉइंट येथील एनसीपीए सभागृहात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे उद्योगमंत्री सामंत म्हणाले.‌ मंत्रालय विधी मंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटेनियो गुटेरस यांनी वातावरण बदलाबद्दल सगळ्या जगाला अपील केले आहे. तापमान वाढीचे युग संपले असून होरपळ युग सुरू झाले आहे. या त्यांच्या आवाहनाला जगभरातून भारत देशाने आणि भारतामध्ये महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यासाठी पहिले पाऊल टाकले, असे सामंत म्हणाले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक