महाराष्ट्र

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा

प्रतिनिधी

एकीकडे धुळवडीचा उत्साह असताना दुसरीकडे संपूर्ण राज्यात विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी संध्याकाळपासूनच औरंगाबाद, नाशिक, नांदेड, अहमदनगर, ठाणे, रायगड या भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला. तसेच, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.

नाशिक जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २ दिवसांच्या अवकाळी पावसाने तब्बल २६०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. एकीकडे कांद्याचे भाव गडगडले असताना दुसरीकडे या पावसामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ढगांचा गडगडाट, विजांच्या लखलखाटात अहमदनगर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे शेतात उभे पिक भुईसपाट झाले असून गहू, हरबरा पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांसाठी प्रशासन काय पाऊल उचलते? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम