महाराष्ट्र

शिंदेंच्या मनात बंडाचं बीज मीच पेरलं; शिंदे गटाच्या या माजी आमदाराचा दावा

महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि राज्याला शिंदे - फडणवीस यांचे सरकार आले.

विक्रांत नलावडे

काही महिन्यांपूर्वी झालेल्या महाराष्ट्रातील बंडानंतर राज्यामध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. यांनतर महाविकास आघाडीचे सरकार पाडून, भाजपने शिंदे गटासोबत नवे सरकार स्थापन केले. तर, शिवसेनेशी बंड करून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. पण बंडाचे बीज पेरल्याचा दावा शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरेंचा महाविकास आघाडी बनवण्याचा विचार हा निवडणुकीपूर्वीच ठरला होता, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

माजी आमदार विजय शिवतारे यांचा एक व्हिडीओ समोर आला असून यामध्ये ते म्हणाले की, "महाविकास आघाडी ही निवडणुकी अगोदरच झाली होती. ते सर्वांची फसवणूक करत आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्या मनात उठावाचे बीज मीच पेरले होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार आले, ते महाराष्ट्राच्या हिताचे नव्हते. हे सरकार आल्यानंतर दोन महिन्यानंतरच मी नंदनवनला गेलो होतो. एकनाथ शिंदे यांच्याशी साडेचार तास चर्चा केली आणि आमच्यात ही चर्चा झाली. एकनाथ शिंदेंना मी सरळ म्हंटले की हे चालणार नाही. हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही, तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा, नाहीतर थोडा दबाव टाका ही युती तोडली पाहिजे. भाजप आणि शिवसेनेचे सरकार आले पाहिजे."

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

सायबर भामट्यांनी खाते रिकामे केले? घाबरू नका; पैसे परत मिळवण्यासाठी अशी करा तक्रार

व्हिडीओ एडिटिंग येत नाही? फक्त काही टॅप्समध्ये साधा व्हिडीओ होईल सिनेमॅटिक; Google Photos चं नवं एआय फीचर लॉन्च

Palghar Landslide : तांदुळवाडी किल्ल्याजवळ दरड कोसळली; पर्यटकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Mumbai : 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास RPF कार्यालयात बसवून ठेवले; व्हायरल VIDEO ची रेल्वेकडून चौकशी