महाराष्ट्र

२० कोटींची जलवाहिनी सहा महिन्यांतच फुटली

लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या सततच्या पाइपलाईन फुटणे, वीज पुरवठा तोडणे, या कारणामुळे नांदुर मध्यमेश्वर धरणात मुबलक पाणीसाठा असूनही लासलगांवकराना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Swapnil S

लासलगाव : सुमारे २० कोटी रुपये खर्च करून सहा महिन्यांपूर्वी केलेली नवीन जलवाहिनी फुटल्याने लासलगावसह इतर १५ गावांना ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून नळाला पाणीच न आल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

लासलगावसह १६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या सततच्या पाइपलाईन फुटणे, वीज पुरवठा तोडणे, या कारणामुळे नांदुर मध्यमेश्वर धरणात मुबलक पाणीसाठा असूनही लासलगांवकराना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. महिन्यातून केवळ तीन ते चार वेळेस गावाला पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

नवीन पाइपलाईनसाठी २० कोटी रुपये खर्च करून सदरची योजना सहा महिन्यांपूर्वी मोठ्या दिमाखात सुरू झाली मात्र पुन्हा नवीन आणि जुनी पाइपलाईन फुटल्याने गावाला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शहरातील नागरिक ऐन कडक उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असून पाण्यासाठी १० ते १२ दिवस आतुरतेने वाट पहावी लागत आहे. तब्बल १० ते १२ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहे.

नवीन झालेली पाइपलाईन सहा महिन्यांतच फुटल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. पाणीटंचाईसाठी महावितरणाची बत्ती गुल होणे, मोटारी जळणे आदी कारणे गेल्या काही वर्षांपासून समोर येत आहेत. मात्र इतकी वर्षे उलटूनही आणि नवीन पाइपलाईन सुरू होऊन पाणी समस्येचे ग्रहण सुटलेले नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

-सचिन आत्माराम होळकर, सरचिटणीस, नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक