मुंबई

चीनी सीमेवर ३५ हजार भारतीय सैनिक तैनात

प्रतिनिधी

भारतीय लष्कराने लडाख सेक्टरमधून ३५ हजार सैनिकांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर स्थलांतरित केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे.

वरिष्ठ सरकारी सूत्रांनी सांगितले की, दोन वर्षांपासून ३५ हजार सैनिक चीन सीमेवर तैनात केले. यातील काही सैनिक हे दहशतवादविरोधी कारवाईत सक्रिय होते.राष्ट्रीय रायफल्सची एक डिवीजनला जम्मू-काश्मीरमधून दहशतवादीविरोधी कारवाईतून मुक्त करून त्यांना लडाख विभागात तैनात केले. तर तेजपूर स्थित गजराज डिव्हीजनकडे चीनच्या सीमेवर देखरेख करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी चीनने भारतीय चौक्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर सैनिक स्थलांतरित करून ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने आपले सैन्याचे पुर्नसंतुलन व पुर्नगठन करत आहे.

तज्ज्ञांनी सांगितले की, पाकिस्तानच्या सीमेपेक्षा जास्त आव्हान आता चीनच्या सीमेवर आहे. तसेच पूर्व लडाख विभागात सैनिकांकडून अत्यंत थंडीमुळे अतिरिक्त सराव करून घेतला जातो. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत व चीनचे सैनिक अनेक वर्षांपासून समोरासमोर उभे ठाकले आहेत.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत