मुंबई

हावडा जिल्ह्यात ज्यूट गिरणीला आग

विजयश्री ज्यूट मिल असे या गिरणीचे नाव असून गिरणीचे मालक राघवेंद्र गुप्ता यांनी आगीची अधिक चौकशी केली जात असल्याचे सांगितले

नवशक्ती Web Desk

कोलकाता : पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात सोमवारी पहाटे ४.५० वाजण्याच्या सुमारास फोरशोअर रोडवर एका तागाच्या गिरणीला आग लागून सुमारे २० ते ३० टन कच्चा ताग नष्ट झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यात कोणती प्राणहानी झाल्याचे वा आतमध्ये कोणी अडकल्याची माहिती तूर्तास तरी हाती आलेली नाही.

छट पूजेसाठी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांनी आणि गिरणीच्या सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी ही आग पाहिली आणि शिबपूर पोलीस ठाण्याला प्रथम माहिती दिली. त्यानंतर दोन अग्निशमन बंब तेथे पोहोचले.

विजयश्री ज्यूट मिल असे या गिरणीचे नाव असून गिरणीचे मालक राघवेंद्र गुप्ता यांनी आगीची अधिक चौकशी केली जात असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी.

गुप्ता हे इंडियन ज्यूट मिल असोसिएशनचेही अध्यक्ष असून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली आहे की फटाक्यांमुळे लागली आहे, ते पाहिले जात आहे, असे सांगितले. ही गिरणी ६५ टन इतक्या ज्यूट उत्पादनाची होती व सुमारे १५०० कामगार तेथे काम करीत होते.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप