मुंबई

हावडा जिल्ह्यात ज्यूट गिरणीला आग

विजयश्री ज्यूट मिल असे या गिरणीचे नाव असून गिरणीचे मालक राघवेंद्र गुप्ता यांनी आगीची अधिक चौकशी केली जात असल्याचे सांगितले

नवशक्ती Web Desk

कोलकाता : पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात सोमवारी पहाटे ४.५० वाजण्याच्या सुमारास फोरशोअर रोडवर एका तागाच्या गिरणीला आग लागून सुमारे २० ते ३० टन कच्चा ताग नष्ट झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यात कोणती प्राणहानी झाल्याचे वा आतमध्ये कोणी अडकल्याची माहिती तूर्तास तरी हाती आलेली नाही.

छट पूजेसाठी मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांनी आणि गिरणीच्या सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी ही आग पाहिली आणि शिबपूर पोलीस ठाण्याला प्रथम माहिती दिली. त्यानंतर दोन अग्निशमन बंब तेथे पोहोचले.

विजयश्री ज्यूट मिल असे या गिरणीचे नाव असून गिरणीचे मालक राघवेंद्र गुप्ता यांनी आगीची अधिक चौकशी केली जात असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी.

गुप्ता हे इंडियन ज्यूट मिल असोसिएशनचेही अध्यक्ष असून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली आहे की फटाक्यांमुळे लागली आहे, ते पाहिले जात आहे, असे सांगितले. ही गिरणी ६५ टन इतक्या ज्यूट उत्पादनाची होती व सुमारे १५०० कामगार तेथे काम करीत होते.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन