मुंबई

आरे मेट्रो कारशेडविरोधात आम आदमी पार्टीची उडी

हनुमान चालीसेचे पठण करून थेट हनुमानालाच ‘आरे वाचवा आणि मुंबई वाचवा’ यासाठी साद घातली जाणार आहे

कल्पेश म्हामुणकर

नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आरे जंगलात मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला अनेक पर्यावरणविषयक संस्था तसेच पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला असून रविवार ३ जुलै रोजी आरे येथे सरकारच्या या निर्णयाविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत.आम आदमी पार्टीने (आप) या प्रकरणात उडी घेतली असून त्यांचे जवळपास एक हजार कार्यकर्ते रविवारी १० वाजता निदर्शने करणार आहेत.

विशेष म्हणजे हनुमान चालीसेचे पठण करून थेट हनुमानालाच ‘आरे वाचवा आणि मुंबई वाचवा’ यासाठी साद घातली जाणार आहे. ‘आप’ने या मोहिमेत मुंबईकरांनीही सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे, असे ‘आप’च्या मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा-मेनन यांनी सांगितले. २०१४ ते २०१९ या कालावधीत भाजप-शिवसेना सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आरे येथे मेट्रो-३चे कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी अनेक संस्था, जागरूक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला होता.

‘आप’टच्या प्रीती शर्मा म्हणाल्या की, “आम्ही त्यांना आरेची एक इंच जागाही घेऊ देणार नाही. आम्हाला मेट्रो हवी आहे, पण त्याची कारशेड कांजूरमार्ग येथेच बांधील जावी. जर आपण आरे जंगल वाचवू शकलो तरच मुंबई वाचवता येईल.”

बंगालमध्ये 'कमळ', तमिळनाडूत 'विजय'; आसाममध्ये BJP ची हॅटट्रिक; दक्षिण मात्र अजूनही दूरच, केरळने डाव्यांना डावलले

सुनेत्रा पवारांचा विक्रम! बारामतीत दोन लाख १८ हजारांच्या फरकाने ऐतिहासिक विजय; राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले विजयी

'गंगोत्री ते गंगासागरापर्यंत' फुलले कमळ; जल्लोषाच्या सभेत मोदींचे प्रतिपादन

स्टालिन, विजय, ममतांशी राहुल यांनी साधला संवाद

जागतिक दमा दिवस २०२६ : उष्णतेच्या लाटा वाढवत आहेत दम्याचा त्रास; रुग्णांनी काय काळजी घ्यावी?