मुंबई

एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करताना सावधान!

फुकट्यांना आवर घालण्यासाठी मध्य रेल्वेची विशेष मोहीम

कमल मिश्रा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील वातानुकूलित लोकल ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी तुमचे तिकीट किंवा पास दोनदा तपासा. मध्य रेल्वेने १९ ते ३१ मे या कालावधीत एसी लोकल गाड्यांमधील अनधिकृत प्रवासाची समस्या सोडवण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. प्रवाशांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करणे आणि कायदेशीर प्रवाशांसाठी एकूण प्रवास अनुभव सुधारणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

“या मोहिमेदरम्यान, दररोज सकाळी ७.४३ ते ११.२८ पर्यंतच्या एकूण ४५ सेवांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) सहकार्याने १६ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, असे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. सध्या मध्य रेल्वेवर ५६ एसी लोकल धावत असून यामध्ये ५० हजारांहून अधिक प्रवाशांची ये-जा सुरू असते.

मोहीम सुरू झाल्यापासून, आढळलेल्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. १९ मे रोजी २५७, २० मे रोजी २४५ आणि २१ मे रोजी २९६ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे २३ मे रोजी विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची २७२ प्रकरणे आढळून आले.

प्रवाशांनी दादर, कुर्ला, घाटकोपर आणि ठाणे यांसारख्या स्थानकांवर गर्दीच्या वेळेत द्वितीय श्रेणीच्या डब्यांबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना या समस्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले. शिवाय, एसी डब्यांचे वारंवार नॉन-एसी डब्यांमध्ये रूपांतर होत असल्याबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली, जी नित्याचीच झाली आहे. त्यांनी रेल्वे प्रशासनाला भाड्यातील फरक परत करणे किंवा बाधित प्रवाशांना योग्य नुकसान भरपाई देण्यासारखे पर्याय शोधण्याची विनंती केली.

मध्य रेल्वेवरील एसी लोकल - ५६

दररोज प्रवास करणारे - ५० हजार

दररोज पकडली जाणारी प्रकरणे - १७०

मोहीम सुरू झाल्यानंतरची दररोजची प्रकरणे - २७०

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक