मुंबई

गणेश भक्तांच्या सेवेत बेस्ट

प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाची धूम वेगळीच असते. उंच उंच गणेश मूर्ती, आकर्षक देखावे पर्यटकांसह भक्तांचे आकर्षण असते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या १० दिवसांत भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमाने रात्री अतिरिक्त बसेस प्रवाशांच्या सेवेत चालवण्याचा निर्णय घेतल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

मंगळवार १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान मुंबईत गणेशोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. सुबक आकर्षक उंच मूर्ती, मंडपातील आकर्षक देखावे, विद्युत रोषणाई हे सगळं भक्तांचे आकर्षण ठरते. गणेशोत्सवात भक्तांना मुंबईतील बाप्पाचे दर्शन योग्यरित्या मिळावे यासाठी बेस्ट उपक्रमाने रात्री १२ ते पहाटे ६ वाजेपर्यंत अतिरिक्त बस सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Video : बिनशर्त पाठिंब्यानंतर नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर, समोर आला पहिला टिझर

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी वर्तवला अंदाज

पाच वर्षाच्या मुलामुळे बंद होणार दारूची दुकाने, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

EVM की खेळणं! BJP नेत्याच्या लहान मुलानं केलं मतदान; नेत्यावर गुन्हा दाखल, अधिकारी निलंबित

Nagpur Shocker : शाळेतून घरी सोडणाऱ्या रिक्षाचालकाने केला १० वीच्या मुलीचा विनयभंग; Video व्हायरल झाल्यावर घटना उघडकीस