मुंबई

BMC चे धोरण बिल्डरधार्जिणे; हायकोर्ट संतापले; "जर यापुढे बदल झाला नाही तर..."

पालिका जर नागरिकांचे हित जपण्याचे कर्तव्य सोडून बिल्डरधार्जिणे धोरण अवलंबत असेल, तर खपवून घेतले जाणार नाही. जर यापुढे त्यात बदल झाला नाही, तर...

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या बिल्डरधार्जिण्या धोरणावर उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला. न्यायालयात येणाऱ्या अनेक प्रकरणांत पालिकेचे बिल्डरधार्जिणे धोरण स्पष्ट दिसते. न्यायमूर्ती महेश सोनक व न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने बिल्डरची मर्जी राखण्यासाठी पालिकेने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. पालिका जर नागरिकांचे हित जपण्याचे कर्तव्य सोडून बिल्डरधार्जिणे धोरण अवलंबत असेल, तर खपवून घेतले जाणार नाही. जर यापुढे त्यात बदल झाला नाही, तर कायद्याचा बडगा दाखवून अधिकाऱ्यांना वठणीवर आणायला मागेपुढे पाहणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने पालिकेला खडेबाल सुनावले.

घाटकोपर पश्चिमेकडील एलबीएस रोडच्या रूंदीकरण प्रकल्पात भारत भयानानी यांच्या मालकीची तीन दुकाने प्रभावित झाली. त्यातील दोन दुकानांचा काही भाग रस्ता रूंदीकरणादरम्यान पाडण्यात आला. भारत भयानानी रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला जागा देण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले. त्यावेळी तिसऱ्या दुकानाची उरलेली जागा वापरण्यास पालिकेने मुभा दिली. त्यानुसार भयानानी दुकानाचे दुरुस्तीकाम हाती घेतले. मात्र हे काम अनधिकृत ठरवून पालिकेने नोटीस पाठवली. त्यावर याचिकाकर्त्याने परवानगी मिळवण्यासाठी अर्जही केला. त्या अर्जावर निर्णय न देताच पालिकेने २०२१ मध्ये दुकान पाडले. त्या विरोधात भारत भयानानी यांच्या वतीने याचिका दाखल केली आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत