मुंबई

संततधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबाने

प्रतिनिधी

मुंबईत बुधवार सकाळपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल साधारण १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. कोसळणारा संततधार पाऊस आणि विलंबाने धावणाऱ्या लोकलमुळे मुंबईकरांची एकच तारांबळ उडाली असून अनेकांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाला.

मुंबईसह महानगरामध्ये बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कोसळणाऱ्या पावसाचा फटका मध्य आणि पश्चिम उपनगरीय सेवेला बसला. जोरदार पावसामुळे लोकल चालवताना मोटरमनला समस्या येत होत्या. त्यामुळे लोकलचा वेग मंदावला. परिणामी, लोकल विलंबाने धावत आहेत. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसारा मार्गावरील अप-डाउन लोकल १० ते १५ मिनिटे, सीएसएमटी ते पनवेल, तसेच पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार, डहाणू दरम्यानच्या लोकल ५ ते १० मिनिटे विलंबाने धावत आहेत.त्यामुळे लोकल गाड्यांना गर्दी होत असून कामावर जाणाऱ्यांनाही काहीसा उशीर होत आहे.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे