मुंबई

संततधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबाने

मुंबईसह महानगरामध्ये बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

प्रतिनिधी

मुंबईत बुधवार सकाळपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल साधारण १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. कोसळणारा संततधार पाऊस आणि विलंबाने धावणाऱ्या लोकलमुळे मुंबईकरांची एकच तारांबळ उडाली असून अनेकांना कार्यालयात पोहोचण्यास विलंब झाला.

मुंबईसह महानगरामध्ये बुधवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. कोसळणाऱ्या पावसाचा फटका मध्य आणि पश्चिम उपनगरीय सेवेला बसला. जोरदार पावसामुळे लोकल चालवताना मोटरमनला समस्या येत होत्या. त्यामुळे लोकलचा वेग मंदावला. परिणामी, लोकल विलंबाने धावत आहेत. मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसारा मार्गावरील अप-डाउन लोकल १० ते १५ मिनिटे, सीएसएमटी ते पनवेल, तसेच पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते विरार, डहाणू दरम्यानच्या लोकल ५ ते १० मिनिटे विलंबाने धावत आहेत.त्यामुळे लोकल गाड्यांना गर्दी होत असून कामावर जाणाऱ्यांनाही काहीसा उशीर होत आहे.

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

Mumbai : ४०० टन वजनी क्रेन उलटली; BKC मध्ये मेट्रो कामादरम्यान मोठा अपघात

पुण्यातील वरिष्ठ शास्त्रज्ञाला 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात ओढले; सायबर चोरट्यांनी तब्बल ७८ लाख रुपये लुटले

"मुलगा माझ्यासारखा दिसत नाही..."; पत्नीवरील संशयामुळे पित्यानेच घेतला सहा वर्षीय मुलाचा जीव; चौकशीत धक्कादायक खुलासा

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी