मुंबई

चिंचपोकळी ब्रिज धोकादायक; नागरिकांनी पुलावरून वाहन चालवणे टाळावे पालिकेचे आवाहन

नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक छोटी-मोठी दुरुस्ती तर अतिधोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्याचे धोरण आखले आहे

प्रतिनिधी

बाप्पाच्या आगमनाला फक्त काही दिवस शिल्लक असून यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे. मात्र बाप्पाच्या विसर्जनासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत धोकादायक पुलांचे विघ्न समोर आले आहे. पालिकेने चिंचपोकळी ब्रिजलासुद्धा धोकादायक ठरवल्यामुळे नागरिकांनी या पुलावरून वाहन चालवणे टाळावे, असे आवाहन केले आहे.

अंधेरीत ३ जुलै, २०१८ रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि १४ मार्च, २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व सुमारे ३४४ पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक छोटी-मोठी दुरुस्ती तर अतिधोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्याचे धोरण आखले आहे.

या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात धोकादायक पुलांवर गर्दी होऊन दुर्घटना होऊ नये, यासाठी धोकादाय पुलांची यादी जाहीर केली आहे. पालिका आणि पोलिसांनी दिलेल्या सुचनेनुसारच या पुलांवरून ये-जा करावी असे निर्देशही पालिकेने दिले आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल बनला द्विशतकी विक्रमादित्य! अनेक विक्रमांना गवसणी; कोहली, सचिनचा रेकॉर्डही मोडला

चीनकडून नव्या डावपेचांची आखणी