मुंबई

सहा दिवस समुद्राला मोठे उधाण,उंच लाटा उसळणार

समुद्राला भरती असणाऱ्या वेळी मुंबईत अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता आहे.

प्रतिनिधी

मुंबईत उद्यापासून सलग सहा दिवस समुद्राला मोठे उधाण राहणार आहे. यावेळी समुद्रात ४.५ मीटरहून जास्त उंचींच्या लाटा उसळणार आहेत. शिवाय काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देत हवामान खात्यानेही पुढील दोन दिवस ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे. त्यामुळे चौपाट्यांवर येणार्‍या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

समुद्राला भरती असणाऱ्या वेळी मुंबईत अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता आहे. शिवाय जोराचे वारे आणि समुद्रात जाणारे पावसाचे पाणी अडल्यास धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. समुद्राच्या उधाणात ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळल्यास धोक्याचा इशारा दिला जातो. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अशा उसळणार लाटा

१३ जुलै : ४.६८ मीटर (स.११ वाजून ४४ मि.)

१४ जुलै : ४.८२ मीटर (दु.१२ वाजून ३३ मि.)

१५ जुलै : ४.८७ मीटर (दुपारी १ वाजून २२ मि.)

१६ जुलै : ४.८५ मीटर (दुपारी २ वाजून ८ मि.)

१७ जुलै : ४.७३ मीटर (दुपारी २ वाजून ५४ मि.)

१८ जुलै : ४.५१ मीटर (दुपारी ३ वाजून ३८ मि.)

गुजरातच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी; तरुण नेते हर्ष संघवींची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी, रिवाबा जडेजानेही घेतली शपथ

'बदला' घेण्यासाठी महिलेने मुंबई लोकल ट्रेनच्या मोटरमनवर केली दगडफेक? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर

इंजिनिअर ते करणी सेनेची महिला प्रमुख, रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा गुजरातची नवी मंत्री, अवघ्या तीन वर्षात मिळवलं यश

हर्बल हुक्क्याला कायदेशीर परवानगी; कायद्याच्या चौकटीत राहूनच न्यायालयाचे राज्य सरकारला कारवाईचे निर्देश

Ahilyanagar : राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन