मुंबई

पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठ्यात केली सुधारणा; महापालिका तब्बल २२ कोटी रुपये खर्चणार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असून जीर्ण झाल्या आहेत.

प्रतिनिधी

कमी दाबाने पाणीपुरवठा, गढूळ पाणीपुरवठा या तक्रारी आता दूर होणार आहेत. पश्चिम उपनगरातील रहिवाशांना आता स्वच्छ व भरपूर पाणी मिळणार आहे. जुन्या जलवाहिन्या बदलून ४५० ते ९०० मि.मी. व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या कामासाठी मुंबई महापालिका तब्बल २२ कोटी रुपये खर्चणार आहे. त्यामुळे कांदिवली, बोरिवली व दहिसर येथील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असून जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अपुरा पाणीपुरवठा, गढूळ पाणी अशा तक्रारी येत असतात. मुंबईकरांना समान पाणीवाटपाची अंमलबजावणी योग्यरित्या व्हावी, यासाठी जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्यात येत आहेत. पश्चिम उपनगरातील कांदिवली, बोरिवली व दहिसर भागात पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी ८० ते ३०० मि.मी. व्यासाच्या व काही भागात ४५० व ९०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेच्या जलविभागाने निविदा मागवल्या असून २२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या जलविभागातील अधिकाऱ्याने दिली.

THANE : रामनवमीनिमित्त ट्रॅफिक निर्बंध; वागळे परिसरातील अनेक रस्ते बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Ram Navami 2026 : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो; काय असणार खास? जाणून घ्या वेळ आणि स्थळ

केंद्र सरकारचा निर्णय; घरात PNG असेल तर LPG पुरवठा बंद, गॅस कनेक्शनवर नवे नियम लागू

Mumbai : ८७० रुपयांच्या वादातून संतापजनक प्रकार; ओशिवरामध्ये सिगारेट विक्रेत्याला कारने फरफटत नेले, घटना CCTV मध्ये कैद

मुंबईकरांना दिलासा; मेट्रो 2Bमुळे चेंबूर परिसरातील प्रवास होणार जलद