मुंबई

पश्चिम उपनगरातील पाणीपुरवठ्यात केली सुधारणा; महापालिका तब्बल २२ कोटी रुपये खर्चणार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असून जीर्ण झाल्या आहेत.

प्रतिनिधी

कमी दाबाने पाणीपुरवठा, गढूळ पाणीपुरवठा या तक्रारी आता दूर होणार आहेत. पश्चिम उपनगरातील रहिवाशांना आता स्वच्छ व भरपूर पाणी मिळणार आहे. जुन्या जलवाहिन्या बदलून ४५० ते ९०० मि.मी. व्यासाच्या नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. या कामासाठी मुंबई महापालिका तब्बल २२ कोटी रुपये खर्चणार आहे. त्यामुळे कांदिवली, बोरिवली व दहिसर येथील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटीशकालीन असून जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे अपुरा पाणीपुरवठा, गढूळ पाणी अशा तक्रारी येत असतात. मुंबईकरांना समान पाणीवाटपाची अंमलबजावणी योग्यरित्या व्हावी, यासाठी जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्यात येत आहेत. पश्चिम उपनगरातील कांदिवली, बोरिवली व दहिसर भागात पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी ८० ते ३०० मि.मी. व्यासाच्या व काही भागात ४५० व ९०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई महापालिकेच्या जलविभागाने निविदा मागवल्या असून २२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या जलविभागातील अधिकाऱ्याने दिली.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप