मुंबई

भारतीय पर्यटन क्षेत्रात १० वर्षांत दुपटीने वाढ; ५२ हजार कोटींहून अधिक उलाढाल, ६ कोटी ३० लाख रोजगारनिर्मितीची अपेक्षा

भारतीय पर्यटन क्षेत्र आगामी १० वर्षांत दुपटीने वाढून या क्षेत्रातील एकुण उलाढाल ५२३ बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत, म्हणजे ५२ हजार ३०० कोटी रुपयांपर्यत पोहचण्याची अपेक्षा आहे, असे मत वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम काऊन्सिल (WTTC)च्या अध्यक्ष आणि सीईओ ज्युलिया सिम्पसन यांनी व्यक्त केले आहे.

Swapnil S

मुंबई : भारतीय पर्यटन क्षेत्र आगामी १० वर्षांत दुपटीने वाढून या क्षेत्रातील एकुण उलाढाल ५२३ बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत, म्हणजे ५२ हजार ३०० कोटी रुपयांपर्यत पोहचण्याची अपेक्षा आहे, असे मत वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम काऊन्सिल (WTTC)च्या अध्यक्ष आणि सीईओ ज्युलिया सिम्पसन यांनी व्यक्त केले आहे.

WTTC सरकारांसोबत पर्यटन उद्योगाच्या विविध मुद्यांवर काम करते आणि ती या क्षेत्राच्या आर्थिक आणि सामाजिक योगदानाची जागतिक प्राधिकृत संस्था आहे.

सिम्पसन यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले, भारतात पर्यटन आणि ट्रॅव्हल क्षेत्र साडेचार कोटी लोकांना रोजगार पुरवते आणि त्याची मूल्यवृद्धी होईल. पुढील १० वर्षांत हे क्षेत्र ५२३ बिलियन अमेरिकन डॉलर्सचे, म्हणजेच ५२ हजार ३०० कोटी रुपयांहून अधिक उलाढाल करणारे होईल, जे सध्याच्या २५ हजार ६०० कोटी रुपयांच्या आकारापेक्षा दुपटीने अधिक असेल. दहा वर्षांनंतर भारतातील पर्यटन क्षेत्रात ६ कोटी ३० लाख रोजगार निर्मिती होईल, असेही त्यांनी सांगितले.

सिम्पसन यांच्या मते, भारत हा जगातील सर्वात सुंदर आणि आश्चर्यकारक देशांपैकी एक आहे. शतकांपासून पर्यटक भारताच्या किनाऱ्यांवर आणि अद्भुत शहरांकडे आकर्षित होत आहेत. भारत हा जगाचे खुल्या दिलाने स्वागत करणारा देश असून भारतीय पाहुणचार अत्यंत अप्रतिम आहे, असे त्यांनी नमूद केले.

चांगली गोष्ट अशी आहे की, भारतात पर्यटन क्षेत्र जरी वाढत असले तरी ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन त्याप्रमाणात इतके वेगाने वाढलेले नाही. याचा अर्थ भारत पर्यटन आणि ट्रॅव्हल क्षेत्रासाठी अधिक कार्यक्षम होणार असल्याचे सिम्पसन यांनी स्पष्ट केले.

आम्ही भारतीय सरकारसोबत संवाद साधण्यासाठी उत्सुक आहोत, जेणेकरून ते विमान वाहतूक क्षेत्राशी जोडले जाईल आणि अधिक टिकाऊ विमान इंधन तयार करण्यासाठी मदत होईल, कारण आपण विमान वाहतूक क्षेत्राशिवाय पर्यटन करू शकत नाही, असे सिम्पसन म्हणाल्या.

भारतासाठी एक मोठा संदेश म्हणजे रस्ते वाहतुकीतून होणारे कार्बन उत्सर्जन शक्य तितक्या लवकर संपुष्टात आणणे, असे सिम्पसन यांनी सांगितले.

"जगातील ५० टक्के पर्यटन किनाऱ्यांवर असलेल्या रिसॉर्ट्स आणि समुद्र किनाऱ्यांसारख्या भागांमध्ये होते. पर्यटकांना खूप काँक्रीट पाहायला आवडत नाही; त्यांना जे पाहायचं आहे ते म्हणजे भारताच्या किनाऱ्याभोवती असलेले सौंदर्य, सुंदर नैसर्गिक समुद्रकिनारे, वनस्पती आणि प्राणी. आम्हाला भारतीय सरकारसोबत सहयोग करून काही नैतिक वनस्पतींना पुनर्संचयित करण्यात मदत करण्याची इच्छा आहे.

- ज्युलिया सिम्पसन, प्रमुख, वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम काऊन्सिल

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली