@CMOMaharashtra
मुंबई

'जय जय महाराष्ट्र माझा'चे दुसरे, तिसरे कडवेच राज्यगीत म्हणून गायले जाणार; शासनाने दिले स्पष्टीकरण

महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून 'गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताची निवड करण्यात आली. तर, फक्त दुसरे, तिसरे कडवेच का निवडले? यावर स्पष्टीकरणही देण्यात आले

प्रतिनिधी

मराठी माणसाच्या मनामनात बिंबवलेले 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्याच्या अभिमान गीताची निवड राज्यगीत म्हणून करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बैठकीत हा निर्णय घेतला होता. मात्र, वेळेचा विचार करता 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत मोठे असल्याचे याचे दुसरे आणि तिसरे कडवेच राज्यगीत म्हणून गायले जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रालयाच्या समोर राज्यगीताचा बोर्डही लावण्यात येणार आहे. या राज्यगीताची वेळ १.४५ मिनिटे एवढी असणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीपासून हा निर्णय अंमलात आणला जाणार आहे. भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक राज्याला एक गीत असावे, असा ठराव करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रासाठी ३ गीतांची निवड करण्यात आली होती. यामधून 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताची निवड करण्यात आली. गीतकार राजा बढे यांच्या लेखणीतून आलेल्या या गीताला शाहीर साबळे यांनी गायले आहे. याचे संगीतकार श्रीनिवास खळे आहेत. १ मे १९६० रोजी दादरमधील शिवाजी पार्क येथे झालेल्या समारंभात शाहीर साबळेंनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणे गायले होते.

कोठडीमुळे कामावर गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्याला पगार नाही

बस्तर सफरीवर निघालेल्या मुंबईच्या २४ वर्षीय बायकरचा अपघातात मृत्यू; १५ तासांपूर्वी केली होती 'लेट्स एक्सप्लोर बस्तर' पोस्ट

मुंबईतील स्विमिंग पुलांना पुन्हा पाणीपुरवठा; सातही धरणातील पाणीसाठा योग्य

सिद्धिविनायक मंदिर परिसराला नवी झळाळी; ७८ कोटी खर्च; भूमिगत पार्किंग, भिंतींचे स्टोन क्लॅडिंग; कामाचा १५ ऑगस्टपासून शुभारंभ

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणणार; महसूलमंत्र्यांचे आदेश; कर्जमाफी, शासकीय योजनांचा मिळणार लाभ