Mumbai : बेस्ट प्रवाशांचे हाल कायम; ४,५०० पैकी केवळ ७३५ ईव्ही एसी बसेस ताफ्यात प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : बेस्ट प्रवाशांचे हाल कायम; ४,५०० पैकी केवळ ७३५ ईव्ही एसी बसेस ताफ्यात

बेस्ट उपक्रमाने ओलेक्ट्रा कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या ४,५०० सिंगल डेकर वातानुकूलित (एसी) इलेक्ट्रिक बसपैकी आतापर्यंत केवळ ७३५ बसेस ताफ्यात दाखल झाल्या असून, तीन वर्षांनंतरही बस पुरवठा पूर्ण करण्यात कंपनीला अपयश आले आहे.

Swapnil S

मुंबई : बेस्ट उपक्रमाने ओलेक्ट्रा कंपनीकडून भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या ४,५०० सिंगल डेकर वातानुकूलित (एसी) इलेक्ट्रिक बसपैकी आतापर्यंत केवळ ७३५ बसेस ताफ्यात दाखल झाल्या असून, तीन वर्षांनंतरही बस पुरवठा पूर्ण करण्यात कंपनीला अपयश आले आहे. यामुळे बेस्टच्या ताफ्यात अपेक्षित वाढ झाली नसल्याने प्रवाशांचे हाल कायम आहेत.

मुंबईतील बेस्ट प्रवाशांना वेळेत बेस्ट बस येईल, याची प्रतीक्षा आजही कायम आहे. उन्हाळा असो वा पावसाळा तासन् तास बसथांब्यावर बसची प्रतीक्षा करणे बसथांबे आणि स्थानकांची दुरवस्था, त्यावरील अतिक्रमणे तसेच अपुरा बसताफा यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.

बेस्टने २३ मे २०२३ रोजी २,१०० एसी इलेक्ट्रिक सिंगल डेकर बस पुरविण्याचे कंत्राट ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला दिले होते. या करारानुसार आतापर्यंत सर्व बस ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात केवळ ६८६ बसेस दाखल झाल्या आहेत. त्यानंतर सुमारे दीड वर्षांपूर्वी याच कंपनीला आणखी २,४०० एसी इलेक्ट्रिक बसेस पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले.

स्वमालकीच्या बसेसची संख्याही घटली

सध्या बेस्टच्या ताफ्यात सुमारे २,८०० बस असून त्यापैकी २४९ बस स्वमालकीच्या, तर उर्वरित भाडेतत्त्वावरील आहेत. याउलट २०२२-२३ मध्ये बेस्टकडे ३,५६९ बस होत्या. त्यामध्ये १,८८१ स्वमालकीच्या आणि १,६८८ भाडेतत्त्वावरील बसेसचा समावेश होता. गेल्या काही वर्षांत स्वमालकीच्या बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मतदार अर्ज १७ ऑगस्टपर्यंत भरा! मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

Mumbai : आंबेडकर भवन पाडकाम तपास SIT कडे वर्ग करा; हायकोर्टाचा राज्य सरकारला सल्ला

राज्यात ३० हजारांहून अधिक शिक्षकांची भरती सुरू; शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांची माहिती

रेस्टॉरंट्स बंद पडतील असे बोलू नका! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंढेंना नाव न घेता तंबी

Thane : जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीत ३१ जणांचा मृत्यू; २३ जण जखमी, भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १५ बळी