पात्र फेरीवाल्यांना देणार 'क्यूआर कोड' आधारित प्रमाणपत्र; मुंबईत १५ हजार पात्र फेरीवाले, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती  
मुंबई

पात्र फेरीवाल्यांना देणार 'क्यूआर कोड' आधारित प्रमाणपत्र; मुंबईत १५ हजार पात्र फेरीवाले, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती

मुंबईतील पदपथ ‘‘फेरीवालेमुक्त’ करण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात विशेषत: बांगलादेशी फेरीवाले रडारवर आले आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेनेही मुंबईचे फुटपाथ ‘फेरीवालामुक्त’ करण्यासाठी पात्र फेरीवाल्यांना ‘क्यूआर कोड’आधारित प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील बेकायदा फेरीवाल्यांविरोधात पालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. मुंबईचे फुटपाथ मुंबईकरांना चालण्यासाठी असून यापुढे अधिकृत फेरीवाल्यांना ‘क्यूआर कोड’आधारित प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. मुंबईत १५ हजार अधिकृत फेरीवाले असून राज्य सरकारच्या नियमानुसार फेरीवाल्यांना अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) सादर करणे बंधनकारक आहे, असे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पालिका आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईतील पदपथ ‘‘फेरीवालेमुक्त’ करण्यासाठी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात विशेषत: बांगलादेशी फेरीवाले रडारवर आले आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेनेही मुंबईचे फुटपाथ ‘फेरीवालामुक्त’ करण्यासाठी पात्र फेरीवाल्यांना ‘क्यूआर कोड’आधारित प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत एकूण १ लाख फेरीवाले

मुंबईत १ लाख फेरीवाले असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुंबईतील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात १५ हजार पात्र फेरीवाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पात्र फेरीवाल्यांना ‘क्यूआर कोड’आधारित प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्याचे भूषण गगराणी यांनी सांगितले.

केंद्राच्या तात्पुरत्या बंदीनंतर प्ले स्टोअरवर Telegram पुन्हा सुरू; पण ॲप स्टोअरवरून अजूनही गायब

Lucknow Fire : लग्नाचं स्वप्न झालं भस्मसात! जिथे प्रेम फुललं, तिथेच जोडप्याचा अंत, लखनऊ अग्निकांडमधील मन सुन्न करणारी घटना

Ulhasnagar : २०० हून अधिक आधारकार्ड कचऱ्यात

Mumbai : शमीर पटेल यांचे नगरसेवक पद रद्द; ‘एमआयएम’ला धक्का

मराठवाड्यात फक्त २ टक्के पेरण्या; पाऊस लांबल्याचा परिणाम