मुंबई

ठाकरे गटाला न्यायालयाचा दणका; मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या २२७ राहणार

शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने केली होती याचिका, नेमकं प्रकरण काय?

नवशक्ती Web Desk

शिंदे फडणवीस सरकारने मुंबई महापालिकेतील प्रभाग रचनेसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर मुंबई उच्चं न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने शिंदे फडणवीस सरकारने काढलेला अध्यादेश कायम ठेवावा, असे निर्देश दिले आहेत. यामुळे ठाकरे गटाला मोठा दणका बसला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना मुख्यमंत्री पदावर उद्धव ठरले होते. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या ही २३६ केली होती. यानंतर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने हा अध्यादेश रद्द करत कायद्यात फेरदुरुस्ती करून प्रभागांची संख्या पूर्ववत म्हणजेच २२७ केली होती. याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी याचिका दाखल केली होती. यानंतर आज मुंबई उच्चं न्यायालयाने यासंदर्भात शिंदे - फडणवीस सरकारच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे आता आगामी निवडणुकीमध्ये प्रभागांची संख्या ही २२७ असेल.

Mumbai : प्रवाशांची होणार गैरसोय; उद्या पश्चिम व मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Iran vs US-Israel War: तेल पुरवठ्यात अस्थिरता; इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला

Mumbai : उद्धव ठाकरे यांच्याकडून एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्सचा शुभारंभ; काय आहे खास? फी किती? जाणून घ्या

Mumbai : धक्कादायक! वृद्धाश्रमात ज्येष्ठ महिलेला झाडूने मारहाण; Video व्हायरल होताच संतापाची लाट

Mumbai : '...तर गॅस कनेक्शन बंद होईल!' Mahanagar Gasच्या नावाने सायबर स्कॅम; अंधेरीत महिलेला ₹५,०००चा गंडा