मुंबई

ठाकरे गटाला न्यायालयाचा दणका; मुंबई महापालिकेतील प्रभाग संख्या २२७ राहणार

शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने केली होती याचिका, नेमकं प्रकरण काय?

नवशक्ती Web Desk

शिंदे फडणवीस सरकारने मुंबई महापालिकेतील प्रभाग रचनेसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर मुंबई उच्चं न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने शिंदे फडणवीस सरकारने काढलेला अध्यादेश कायम ठेवावा, असे निर्देश दिले आहेत. यामुळे ठाकरे गटाला मोठा दणका बसला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना मुख्यमंत्री पदावर उद्धव ठरले होते. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या ही २३६ केली होती. यानंतर आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने हा अध्यादेश रद्द करत कायद्यात फेरदुरुस्ती करून प्रभागांची संख्या पूर्ववत म्हणजेच २२७ केली होती. याविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी याचिका दाखल केली होती. यानंतर आज मुंबई उच्चं न्यायालयाने यासंदर्भात शिंदे - फडणवीस सरकारच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे आता आगामी निवडणुकीमध्ये प्रभागांची संख्या ही २२७ असेल.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत