मुंबई

Mumbai Pollution : या कारणांमुळे मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही खराब; वायू प्रदूषणात वाढ झाल्याने चिंता वाढली

मुंबईतील हवेचा दर्जा (Mumbai Pollution) घसरला असून मुंबईची हवा प्रदूषित होत असल्याचे एका अहवालामध्ये स्पष्ट झाले आहे, पण यामागचे नेमके कारण काय?

प्रतिनिधी

मुंबईकरांसाठी (Mumbai) एक चिंता वाढवणारी बातमी म्हणजे मुंबईच्या हवेचा दर्जा (Mumbai Pollution) घसरला आहे. अहवालानुसार, मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली आहे. मुंबईमध्ये काही ठिकाणी हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने ३००चा तर काही ठिकाणी २००चा टप्पा पार केला आहे. ही पातळी अत्यंत खराब मानली जात असून हवा प्रचंड दुषित झाली आहे. सर्वाधिक चिंतेची बात म्हणजे, दिल्ली पेक्षाही मुंबईची हवा प्रदूषित झाली आहे. सोमवारी मुंबईची एकूण एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) पातळी २२५ नोंदवण्यात आली. तर, दिल्लीची एकूण एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) पातळी १५२ होती. ही आकडेवारी हवा गुणवत्ता आणि हवामान अंदाज आणि संशोधन प्रणाली (SAFAR)च्या संशोधनात समोर आली आहे.

या कारणामुळे होतेय मुंबईची हवा दूषित

सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्चचे संस्थापक प्रकल्प संचालक डॉ. गुफ्रान बेग यांनी सांगितले की, नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२२मध्ये हवेची गुणवत्ता वाईट स्तरावर घसरण्यासाठी केवळ औद्योगिक स्त्रोतांद्वारे होणारे उत्सर्जन हा एकमेव घटक कारणीभूत असू शकत नाही. तर मुंबईत सुरू असणाऱ्या बांधकामामुळे होणारे उत्सर्जनामुळे उच्च हवा प्रदूषणाच्या घटना वाढणे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. बांधकामातून उडणाऱ्या धुळीमुळे पीएम २.५ आणि पीम १० दोन्हीच्या प्रमाणात वाढ होण्यात चालना मिळून मुंबईच्या हवेची गुणवत्ता बिघडली.

Nepal Floods: महाराष्ट्रातील ८० जण अडकले; केवळ ४-५ जणांशीच संपर्क, मंत्री महाजनांची माहिती; राज्य सरकारकडून हेल्पलाईन सुरू

साखरेचे दर चढेच; देशात सरासरी दर ६५ रुपये किलो

Nepal Floods: भारत नेपाळच्या मदतीला; ३७.५ टन मदतसाहित्य रवाना, १६० हून अधिक मृत्यू, ८०० जणांचा अद्याप ठाव नाही

Mumbai : रेल्वे कॅटरिंग कर्मचाऱ्यांसाठी गणवेश अनिवार्य; मुंबई विभागातील रेल्वे स्टॉल्ससाठी सुधारित नियमावली लागू; पश्चिम रेल्वेचा निर्णय

मानवासाठी ४० टक्के नोकऱ्या राखीव ठेवा; अमेरिकन उद्योगपती बिल गेटस् यांचे आवाहन