मुंबई

पालिकेची मान्सूनपूर्व नालेसफाई सुरू; निविदांचा धडाका सुरू

Swapnil S

मुंबई : गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये तब्बल २८० कोटी रुपये खर्च करूनही ‘नाल्यातील गाळ नाल्यात’ अशी टीका भाजपसह विरोधकांनी केली होती. त्यामुळे यंदा मुंबई महापालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला प्राधान्य दिले आहे. नालेसफाई, मिठी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी यंदा १५० कोटींहून अधिकच्या निविदा गुरुवारी मागवल्या आहेत.

पावसाळ्यापूर्वी लहान-मोठ्या नाल्यातील गाळ काढणे, रस्त्यांवरील कल्व्हर्ट साफ करणे, बॉक्स ड्रेन, रोडसाइड ड्रेनमधील गाळ काढणे आदी कामे करण्यासाठी १५० कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. आता प्रमुख अभियंता पर्जन्य जलवाहिन्या यांनी आणखी याच कामासाठी निविदा मागविल्या आहेत. पूर्व उपनगरासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यात मुलुंडमधील लहान नाल्यांच्या पूनर्बांधणीसाठी १ कोटी ७९ हजार रुपये, कुर्ला प्रीमियर लेन्थ नाला, गौरीशंकर नगर नाला ते रामदेव पीर नाला आदी नाल्यांचे खोलीकरण यासाठी ६ कोटी ४१ लाख रुपये, एम पूर्व येथील देवनार म्युनिसिपल कॉलनी येथील अहिल्याबाई होळकर मार्ग सर्व्हिस रोड, देवनार नाला रुंदीकरण आणि खोलीकरण यासाठी १० कोटी १२ लाख रुपयांच्या निविदा काढण्यात आल्याचे पालिकेने सांगितले.

वांद्रे पश्चिम येथील जलप्रलय रोखण्यासाठी वांद्रे स्टेशन पश्चिम येथे मस्जिदजवळ कल्व्हर्टचे काम केले जाणार आहे. सांताक्रुझ स्टेशन रोड येथील बॉक्स ड्रेनचे बाधकाम, वांद्रे पूर्व भागातील पर्जन्य जलवाहिन्यांची पुनर्बांधणी, जोगेश्वरी पूर्व येथील नाल्यांचे बांधकाम, बोरिवली पश्चिम येथील जलप्रलय रोखण्यासाठी कल्व्हर्टचे काम करण्यात येणार आहे. चारकोप कांदिवली, मालाडमधील पर्जन्य वाहिन्यांचे बांधकाम तसेच कल्व्हर्टची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. या कामासाठी सुमारे ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त