मुंबई

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पतीला अटक

Swapnil S

मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून दीपा राजेश यादव या महिलेची तिच्याच पतीने हत्या करून पलायन केले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपी पतीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. राजेश यादव असे या आरोपी पतीचे नाव असून, अटकेनंतर त्याला कांजूरमार्ग पोलिसाकडे सोपिवण्यात आले आहे.

कांजूरमार्ग येथे दीपा ही तिचा टेम्पोचालक पती राजेश यादवसोबत राहत होती. या दोघांचा प्रेमविवाह झाला होता; मात्र तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. याच वादातून राजेशने दीपाची हत्या करून तिचा मृतदेह कापडी पट्टीने बांधून बेडशीटमध्ये गुंडाळून पलायन केले होते. मंगळवारी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक रहिवाशांनी ही माहिती कांजूरमार्ग पोलिसांना सांगितली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तपासात तो मृतदेह दीपाचा होता, तिच्या हत्येनंतर तिचा पती पळून गेला होता. त्यामुळे कांजूरमार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून राजेशचा शोध सुरू केला होता.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस