मुंबई

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; पतीला अटक

तिच्या हत्येनंतर तिचा पती पळून गेला होता

Swapnil S

मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून दीपा राजेश यादव या महिलेची तिच्याच पतीने हत्या करून पलायन केले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या आरोपी पतीला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. राजेश यादव असे या आरोपी पतीचे नाव असून, अटकेनंतर त्याला कांजूरमार्ग पोलिसाकडे सोपिवण्यात आले आहे.

कांजूरमार्ग येथे दीपा ही तिचा टेम्पोचालक पती राजेश यादवसोबत राहत होती. या दोघांचा प्रेमविवाह झाला होता; मात्र तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. याच वादातून राजेशने दीपाची हत्या करून तिचा मृतदेह कापडी पट्टीने बांधून बेडशीटमध्ये गुंडाळून पलायन केले होते. मंगळवारी त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक रहिवाशांनी ही माहिती कांजूरमार्ग पोलिसांना सांगितली. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तपासात तो मृतदेह दीपाचा होता, तिच्या हत्येनंतर तिचा पती पळून गेला होता. त्यामुळे कांजूरमार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून राजेशचा शोध सुरू केला होता.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल