मुंबई

'अधीश' वाचवण्यासाठी नारायण राणेंनी घेतली उच्च न्यायालयात धाव

१५ दिवसांत बंगल्यातील बांधकाम हटवण्याचे आदेशही दिले होते.

प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अधीश बंगला वाचविण्यासाठी नव्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बंगल्याचा अनियमित भाग नियमित करण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. हा अर्ज सुनावणी घेण्यास योग्य कसा, हे न्यायालयाला पटवून द्या, असे निर्देश न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती कमल खटा, यांच्या खंडपीठाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिले.

जुहू येथील अधीश बंगल्यातील काही भाग पाडण्यासंदर्भात मुंबई पालिकेने नारायण राणेंच्या कुटुंबातील भागधारक असलेल्या कालका रिअल इस्टेट प्रा. लि. या कंपनीला मार्चमध्ये नोटीस बजावली. १५ दिवसांत बंगल्यातील बांधकाम हटवण्याचे आदेशही दिले होते. या नोटिशीला राणे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले त्यावेळी बांधकाम नियमित करण्याचा प्रस्ताव करून त्यावर सुनावणी देऊन राणेंच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले होते.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय? २०१२ पासून आजपर्यंत काय घडलं?

Christmas 2025 : ख्रिसमसला मुंबई फिरायचीये? मग 'या' चर्चना भेट द्यायला विसरू नका

सोनिया गांधी, राहुल गांधींना मोठा दिलासा! नॅशनल हेराल्ड केसमध्ये कोर्टाने ED ची तक्रार फेटाळली; "FIR नसेल तर मनी लॉन्ड्रींग...

NEET ची खोटी गुणपत्रिका बनवून जे. जे. हॉस्पिटलच्या हॉस्टेलमध्ये बेकायदेशीर वास्तव्य; २१ वर्षीय तरुणाला अटक