मुंबई

आता दादरऐवजी परळवरून १२ गाडया सुटणार

दादरच्या फलाट एकची रुंदी वाढवली जाणार आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : दादर रेल्वे स्थानक मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण आहे. यातील गर्दी कमी करायला दादरहून सुटणाऱ्या १२ गाड्या परळवरून सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. येत्या १५ सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे.

दादरहून रोज २.५ लाख प्रवासी प्रवास करतात. दादरमधील गर्दी कमी करायला १२ गाड्या दादरहून परळहून सोडण्याचा निर्णय घेतला. या गाड्या सध्या दादरच्या फलाट क्रमांक दोन वरून सुटतात.

तसेच दादरच्या फलाट एकची रुंदी वाढवली जाणार आहे. सध्या ती ७ मीटर असून ती १०.५ मीटर केली जाणार आहे. यासाठी १ कोटी रुपये खर्च होणार आहे. हा प्रकल्प दोन महिन्यात पूर्ण होईल.मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे म्हणाले की, या फलाटाची रुंदी वाढवल्याने तेथे नवीन एक्स्लेटर बसवता येऊ शकतील. तसेच पुलाचा विस्तार होऊ शकेल.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप