मुंबई

मराठी अभिनेत्री केतकी चितळेचे अटकेला आव्हान, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात केतकीविरुद्ध १४ मे २०२२ रोजी बदनामीचा गुन्हा दाखल केला होता.

वृत्तसंस्था

अभिनेत्री केतकी चितळे ही तीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. पण सध्या तिने राष्ट्रवादी कॅंाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अटक केली. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात केतकीविरुद्ध १४ मे २०२२ रोजी बदनामीचा गुन्हा दाखल केला होता. कळंबोली येथून तिला अटक करण्यात आली होती.

ही अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत केतकीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी तिने तिचे गुन्हा रद्द करण्याच्या मागणीवरुन याचिका दाखल केली असून ती अजुन प्रलंबित आहे. आधीच्या याचिकेत केतकीने जामिनावर सुटका करण्याची मागणी देखील केली होती. नव्या याचिकेत कळवा पोलिसांनी केलेली अटक बेकायदा ठरवण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाने अटक करण्याबाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याचा दावाही केतकी चितळेने केला आहे.

बदनामी करणे, धर्म आणि वंशाच्या आधारे विविध समाजांमध्ये शत्रुत्व वाढवणे इत्यादी आरोप केतकी चितळेवर करण्यात आले आहेत.

Mumbai Rain : मेघगर्जनेसह पावसाचे जोरदार पुनरागमन! वांद्रे-वरळीसह अनेक भागांत मुसळधार सरी, ऑरेंज अलर्ट जारी

राजकारण कराल तर राजकीय उत्तर मिळेल; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांना इशारा; विधिमंडळ अधिवेशन आजपासून

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट? आर्थिक मदत न मिळाल्यास पुढील महिन्यात लालपरीची चाकेही थांबण्याची भीती

१ हजार कोटी मालमत्ता जप्त; गोव्यात ED ची कारवाई; बेकायदेशीर लोहखनिज उत्खनन प्रकरण

बीएलओ एसआयआर ड्युटीविरोधात शिक्षक भारती करणार आंदोलन