TMC
मुंबई

मुंबईत २९१ ठिकाणी दरडींचा धोका, रहिवाशांसाठी संरक्षक भिंत उभारणार; पालिका ११५ कोटी रुपये खर्च करणार

भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला पूर्व, साकीनाका, जोगेश्वरी मालाड या मुंबई उपनगरातील २९१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम असून याठिकाणी २२ हजारांहून अधिक रहिवासी वास्तव्य करत आहेत.

Swapnil S

मुंबई : भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, कुर्ला पूर्व, साकीनाका, जोगेश्वरी मालाड या मुंबई उपनगरातील २९१ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका कायम असून याठिकाणी २२ हजारांहून अधिक रहिवासी वास्तव्य करत आहेत. रहिवाशांच्या सुरक्षेसाठी संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला असून संरक्षक भिंत बांधण्यासह रहिवाशांचे पुनर्वसन व स्थलांतर करण्यात येणार आहे. यासाठी ११५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

मुंबईत २९१ ठिकाणी दरडींचा धोका असून त्यातील २०० हून अधिक ठिकाणे ही कुर्ला ते मुलुंड पश्चिम पर्यंतच्या भागात आहेत. विक्रोळी, भांडूपपर्यंत १३२, घाटकोपरमध्ये ३२ ठिकाणे धोकादायक आहेत. कुर्ला येथे १८ ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. मुलुंड येथील ५ ठिकाणे, देवनार परीसरात ११, मालाडमध्ये १८ आणि मलबार हिल, ताडदेव परिसरात १६ अशी धोकादायक ठिकाणे आहेत.

जिल्हाधिकारी आणि पालिकेने ही ठिकाणे निश्चित केली असून ही ठिकाणे आता संरक्षित केली जाणार आहेत. आवश्यक असेल त्या झोपडीधारकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. आवश्यक तेथे संरक्षक भिती बांधल्या जाणार आहेत. मात्र हे काम पावसाळ्यानंतर लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. 

येथे आहे धोका

  • घाटकोपर – ३२

  • कुर्ला - १८

  • मुलुंड - ५

  • देवनार – ११

  • मालाड – १८

  • मलबार हिल – १६

९६०० झोपड्यांचे होणार स्थलांतरमुंबईतील २९१ ठिकाणे ही डोंगराळ भागातील धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्या ठिकाणी अजूनही २२,४८३ झोपड्यांपैकी ९,६५७ झोपड्यांना इतरत्र स्थलांतरित करण्याची शिफारस मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाने यापूर्वी राज्य सरकारकडे केली आहे. त्यांचे पूनर्वसनही टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण