मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन: अभिवादनासाठी शिवतीर्थावर शिवसैनीकांची गर्दी, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

नवशक्ती Web Desk

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज अकरावा स्मृतीदिन आहे. या निमित्तानं आज मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरील स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी अनेक शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईत शिवाजी पार्क इथं येत आहेत. तसंच महाविकास आघाडीचे नेतेही स्मृतीस्थळावर अभिवादनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

शिवाजी पार्कमध्ये फुलांची सजावट करून तिथं बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा बसवली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झाले होते. दरम्यान शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना कार्यकर्ते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होत आहेत.

मुंबईतील शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळावर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाला आहे. स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करून गेल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याने या परिसरात मोठा प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या पाश्र्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शिवसेच्या (ठाकरे गट ) कार्यकर्त्यांनी गद्दार...गद्दार...अश्या घोषणाबाजी करत शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतीस्थळ परिसरातून बाहेर काढावे अशी मागणी केली...तर शिंदे गटाकडूनही ठाकरे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शिवतीर्थावरुन बाहेर जाण्याची विनंती केली. मात्र शिवतीर्थावरुन बाहेर पडताच दोन्ही गटात पुन्हा जोरदार राडा पाहायला मिळाला.

यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली असल्याचा आरोप शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे. ठाकरे गटाने घोषणाबाजी, धक्काबुक्कीला आधी सुरुवात केली असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे. तर ,शिंदे गटाने जे काही आरोप केले आहेत त्यांना ठाकरे गटाने फेटाळून लावले आहेत. कोणी आधी सुरुवात केली,आणि कोणी आक्षेपार्ह वर्तन केलं आहे. हे सगळे कॅमेऱ्यात कैद झाल आहे असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी म्हटले आहे. आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये या स्थानाचे पावित्र्य भंग अजिबात करायचे नाही, असं ही त्यांनी म्हटलं आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त