मुंबई

साखळी बॉम्बस्फोट दोषींच्या फाशीवर शिक्कामोर्तब नाही

रमेश धनुका आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांच्या खंडपीठा समोर सोमवारी या खटल्याची सुनावणी झाली.

प्रतिनिधी

मुंबईसह संपूर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या लोकल रेल्वेतील साखळी बॉम्बस्फोटाला सोमवारी १६ वर्षे पूर्ण झाली. सत्र न्यायालयाने सात वर्षांपूर्वी दोषी आरोपीना फाशीची शिक्षा ठोठावली. मात्र अद्यापही दोषींच्या फाशीवर उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झालेले नाही. गेली सात वर्षे खटला उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

रमेश धनुका आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांच्या खंडपीठा समोर सोमवारी या खटल्याची सुनावणी झाली. मात्र कामाच्या व्यग्रतेमुळे हे प्रकरण ऐकण्यासाठी किमान पाच ते सहा महिने लागणार असल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने सुनावणी ऑगस्टपर्यंत तहकूब ठेवली.

११ जुलै २००६च्या संध्याकाळी पश्चिम रेल्वेवर अवघ्या ११ मिनिटांत झालेल्या ७ साखळी स्फोटांत तब्बल २०९ निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले होते, तर ७००हून अधिक लोक जखमी झाले होते. या दहशतवाद्यांनी प्रेशर कुकरमध्ये टाईम बॉम्ब ठेवत लोकलमधील फर्स्ट क्लासच्या डब्यांना लक्ष्य केले. ममोक्का न्यायालयाने ९ वर्षांनंतर पाच जणांना फाशिची शिक्षा ठोठावली होती.

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी