मुंबई

पावसाच्या परतण्याने साथीच्या आजारांचा धोका टळला

डेंग्यू, स्वाइन फ्लू, गॅस्ट्रोही नियंत्रणात आल्याने मुंबईसाठी समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे.

प्रतिनिधी

कोरोनाची चौथी लाट रोखण्यात पालिकेला यश आल्यानंतर आता पावसाळ्यात उद‌्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्यात पालिकेला यश आले आहे. पाऊस परतला असून पावसाळी आजारांच्या रुग्णसंख्येत घट झाली असून, गेल्या आठवडाभरात मलेरियाचे रुग्ण निम्म्याने घटले आहेत. डेंग्यू, स्वाइन फ्लू, गॅस्ट्रोही नियंत्रणात आल्याने मुंबईसाठी समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईत २७ सप्टेंबरपर्यंत आठवडाभरात मलेरियाचे १७२, डेंग्यूचे ४१ आणि गॅस्ट्रोचे तब्बल ८८ रुग्ण आढळले आहेत; मात्र गेल्या आठवड्यात मलेरियाचे ८९, डेंग्यूचे ३५, गॅस्ट्रोचे १३ रुग्ण आढळले आहेत. तर चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान, पावसाळी आजारांमुळे ऑगस्टपर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लेप्टो-मलेरियामुळे प्रत्येकी एक आणि डेंग्यू-स्वाईन फ्लूमुळे प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाळी आजार आटोक्यात आले, तरी मुंबईकरांनी काळजी घ्यावी, रस्त्यावर विकले जाणारे उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

...म्हणून कौटुंबिक पेन्शनला नकार नाही; महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदीमध्ये नमूद - न्यायालय

'लाडक्या बहिणी' चिंताग्रस्त! e-KYC करताना अनेक अडचणी; OTP न येणे, पोर्टल बंदच्या वाढत्या तक्रारी; योजनेतून बाद होण्याची भीती

राज्यात आता इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे; चंद्रपूर, गडचिरोलीला मान; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये परीक्षा लांबणीवर; शासकीय रेखाकला परीक्षा आता १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान; स्वतंत्र वेळापत्रक जाहीर

Asia Cup 2025 Final : भारताचा पाकवर दणदणीत विजय! पाकिस्तानला २१ दिवसांत तिसऱ्यांदा धूळ चारली