रामदास आठवले यांचे संग्रहित छायाचित्र 
मुंबई

मुंबई पालिकेतील ५० जागा लढविणार - आठवले

मुंबई महानगर पालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करून सज्ज असले पाहिजे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगर पालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करून सज्ज असले पाहिजे. मुंबईतील ५० जागांची निवड करून त्या जागा लढण्याची तयारी करावी, असे आवाहन आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

आठवले म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची कामगिरी सिद्ध करण्यासाठी कामाला लागावे. त्यासाठी मुंबई प्रदेश कार्यकारिणीने २५ जणांची रिपब्लिकन वर्किंग कमिटी निवडण्यात यावी. महायुतीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला महापालिका निवडणुकीत किमान ३० जागा सोडतील, असा विश्वास आहे. आगामी महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकविण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले.

मुंबई महापालिकेत बदली घोटाळ्याचे सत्र कायम; ५५ अधिकाऱ्यांची पूर्वीच्या यादीतीलच पदस्थापना

पावसाळी हंगामात मांडवा-गेटवे जलवाहतूक बंद; २६ मेपासून सेवा स्थगित

Mumbai : आश्रय योजनेला CRZ च्या मंजुरीची प्रतीक्षा; मंजुरीसाठी मकरंद नार्वेकरांचे एमसीझेडएमएला पत्र

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प : विक्रोळीत ३५० टनी महाकाय कटरहेड भुयारात दाखल; मिठी नदीखाली खोदणार बोगदा

Mumbai : पालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना जनगणनेचे काम; म्युनिसिपल मजदूर युनियनचा तीव्र विरोध