रामदास आठवले यांचे संग्रहित छायाचित्र 
मुंबई

मुंबई पालिकेतील ५० जागा लढविणार - आठवले

मुंबई महानगर पालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करून सज्ज असले पाहिजे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगर पालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करून सज्ज असले पाहिजे. मुंबईतील ५० जागांची निवड करून त्या जागा लढण्याची तयारी करावी, असे आवाहन आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

आठवले म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची कामगिरी सिद्ध करण्यासाठी कामाला लागावे. त्यासाठी मुंबई प्रदेश कार्यकारिणीने २५ जणांची रिपब्लिकन वर्किंग कमिटी निवडण्यात यावी. महायुतीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला महापालिका निवडणुकीत किमान ३० जागा सोडतील, असा विश्वास आहे. आगामी महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकविण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले.

"पटेल जिंकले तरी नेहरू PM कसे?" इतिहास सांगत अमित शहांचा काँग्रेसवर पलटवार

लाडक्या बहिणींना दिलासा; पात्र बहिणींसाठी योजना सुरूच राहणार, ८ हजार कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल

‘५०% रक्कम भरा आणि दंड मिटवा’, सरकारचा मोठा निर्णय : दंडाची रक्कम FASTag मधून वसूल होणार

Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये आईनेच तब्बल ६ मुलांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

BCCI कडून अखेरच्या क्षणी IPL लिलाव यादीत मोठा बदल; माजी RCB खेळाडूसह नवीन ९ जणांचा समावेश