रामदास आठवले यांचे संग्रहित छायाचित्र 
मुंबई

मुंबई पालिकेतील ५० जागा लढविणार - आठवले

मुंबई महानगर पालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करून सज्ज असले पाहिजे.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगर पालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करून सज्ज असले पाहिजे. मुंबईतील ५० जागांची निवड करून त्या जागा लढण्याची तयारी करावी, असे आवाहन आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

आठवले म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची कामगिरी सिद्ध करण्यासाठी कामाला लागावे. त्यासाठी मुंबई प्रदेश कार्यकारिणीने २५ जणांची रिपब्लिकन वर्किंग कमिटी निवडण्यात यावी. महायुतीचा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला महापालिका निवडणुकीत किमान ३० जागा सोडतील, असा विश्वास आहे. आगामी महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा फडकविण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत