राष्ट्रीय

विदेशी गुंतवणूक संस्थांकडून ४४,५०० कोटींच्या समभागांची खरेदी

नऊ महिन्यात भारतीय शेअर बाजारातून २.४६ लाख कोटींच्या समभागांची विक्री केली होती.

वृत्तसंस्था

विदेशी गुंतवणूक संस्थांनी (एफपीआय) ऑगस्टच्या तीन आठवड्यामध्ये तब्बल ४४,५०० कोटींच्या समभागांची खरेदी केली आहे. अमेरिकेतील महागाईत झालेली घट आणि डॉलरमध्ये झालेल्या घसरणीमुळे विदेशी गुंतवणूकदार बाजाराकडे वळल्याचे दिसते. यापूर्वी, सलग नऊ महिन्यानंतर (गेल्या ऑक्टोबरनंतर) पहिल्यांदा जुलै २०२२मध्ये एफपीआयने खरेदी सुरु केली. त्यांनी नऊ महिन्यात भारतीय शेअर बाजारातून २.४६ लाख कोटींच्या समभागांची विक्री केली होती.

जागतिक बाजारातील कल, रुपयाची स्थिती आणि विदेशी गुंतवणूक संस्थांकडून किती प्रमाणात खरेदी सुरु राहते, यावर भारतीय शेअर बाजाराचा कल अवलंबून आहे, असे विश्र्लेषकांचे म्हणणे आहे.

या आठवड्यात ऑगस्टमधील एफ ॲण्ड ओची समाप्ती आहे. त्यामुळे दलाल ऑगस्टमध्ये लाभ घेण्याचा प्रयत्न करतील, असे संतोष मीना, हेड ऑफ रिसर्च, स्वस्तिका इन्व्हेस्टमेंट लि. यांनी म्हटले आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश