राष्ट्रीय

5G आल्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळणार,डेल टेक्नॉलॉजी इंडियाचा दावा

देशात हाय-स्पीड इंटरनेट सेवा देण्यासाठी, 5G स्पेक्ट्रम लिलाव १.५० लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

वृत्तसंस्था

5G आल्यानंतर देशाच्या विकासाला गती येईल. 5G मुळे देशात वेगवान इंटरनेट, औद्योगिक इंटरनेट ऑफ थिंग्ज, एज कॉम्प्युटिंग, कृषी क्षेत्रात रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर, ई-कॉमर्स, आरोग्य सेवा, शिक्षण आणि फार्मा यासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा जलद विकास होईल. 5G कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वाढविण्यात, उद्योगातील उत्पादन खर्च कमी करण्यास आणि गुणवत्ता वाढविण्यात देखील मदत करेल, असे डेल टेक्नॉलॉजी इंडियाचे कार्यकारी मनीष गुप्ता यांनी रविवारी सांगितले.

देशात हाय-स्पीड इंटरनेट सेवा देण्यासाठी, 5G स्पेक्ट्रम लिलाव १.५० लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. डेल टेक्नॉलॉजी कंपनी लवकरच भारतातील खेडे आणि शहरांमध्ये 5G ची वेगवान वाढ पाहणार आहे. गुप्ता म्हणाले की, G स्पेक्ट्रमच्या लिलावात महसुलाचे नवीन विक्रम सातत्याने होत आहेत. शनिवारपर्यंत हा आकडाही दीड लाख कोटींच्या पुढे गेला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, लिलाव देखील २०१५ची विक्रमी पातळी ओलांडत आहे. २०१५ मध्ये, 4G स्पेक्ट्रम लिलावातून १.०९ लाख कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा झाला होता. तर 5G स्पेक्ट्रम लिलावाचा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे. देशात हाय-स्पीड इंटरनेट सेवा देण्यासाठी २६ जुलैपासून 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू झाला आहे. या लिलावात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि अदानी एंटरप्रायजेस या कंपन्या सामील झाल्या आहेत.

भारतावर आता ५०० टक्के टॅरिफ? ट्रम्प प्रशासन 'रशियावरील निर्बंध' विधेयकाद्वारे पुन्हा झटका देण्याच्या तयारीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास; “मुंबईचा महापौर मराठी हिंदू...

"हॉटेलमध्ये बोलावले अन्..."; अल्पवयीन नेमबाज युवतीचा राष्ट्रीय प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

Mumbai : कांदिवलीमध्ये ट्रेडिंगच्या बहाण्याने व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक; भावाला अटक, बहीण फरार

Bigg Boss Marathi 6 : श्रेयस तळपदे जाणार 'बिग बॉस'च्या घरात? अभिनेत्याने स्वतःच सांगितलं, "लोक प्रसिद्धीसाठी काहीही करतात"