राष्ट्रीय

आठ शहरातील सप्टेंबरपर्यंत ७.८५ लाख घरे विक्रीविना

कन्सलटंटने निवासी बाजारपेठांचे सर्वेक्षण केले असून त्यात मुख्यत: आठ शहरांचा समावेश आहे.

वृत्तसंस्था

देशातील आठ शहरातील रिअल इस्टेट कंपन्यांकडील ७.८५ लाख घरे विक्रीविना पडून आहेत. तसेच सध्याच्या खरेदीचा वेग पाहता ही घरे विकण्यासाठी तब्बल ३२ महिन्यांचा कालावधी लागेल, असे प्रॉपटायगरने म्हटले आहे.

तथापि आम्रपाली, जेपी इन्फ्राटेक आणि युनिटेक आदी बडे बिल्डर आधीच दिवाळखोरीत गेल्याने त्याचा मोठा परिणाम , दिल्ली-एनसीआर निवासी बाजारपेठेवर झाला आहे. तेथील १ लाख घरे विक्रीविना पडून आहेत. ती विकण्यासाठी किमान ६२ महिने लागतील, असा अंदाज आहे.

कन्सलटंटने निवासी बाजारपेठांचे सर्वेक्षण केले असून त्यात मुख्यत: आठ शहरांचा समावेश आहे. या शहरांमध्ये अहमदाबाद, दिल्ली एनसीआर (दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि फरिदाबाद ), चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद, कोलकाता, मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (बोईसर, डोंबिवली, मुंबई, माझगाव, पनवेल, ठाणे पश्चिम) आणि पुणे यांचा समावेशआहे.

आठ शहरांमध्ये जुलै ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत ४९ टक्क्यांनी घरांची विक्री होऊन ८३,२२० युनिटस‌् विकली गेली. तर गेल्या वर्षी वरील कालवधीत ५५,९१० घरांची विक्री झाली होती, असेही या अहवालात म्हटले आहे.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप