राष्ट्रीय

'या' कारणामुळे हटवलं कलम ३७० ; केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा

कलम ३७० आणि ३५ A हटवल्यानंतर त्याविरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

नवशक्ती Web Desk

जम्मू-काश्मीर राज्याला दिलेल्या विषेध दर्जा केंद्र सरकारने हटवल्यानंतर तेथीस स्थानिक नागरिकांनी आणि राजकीय पक्षांनी केंद्राच्या या निर्णयाचा निषेध करत त्यावर टीका केली. कलम ३७० आणि ३५ A हटवल्यानंतर त्याविरोधात सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. तसंच केंद्राचा हा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्टात एकत्र सुनावणी सुरु आहे. या सुनावणीदरम्यान कोर्टात केंद्र सकारकडून अजब दावा करण्यात आला आहे. सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टाला याबाबतची माहिती दिली आहे.

जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० मोदी सरकारने रद्द केलं होतं. पण हे कलम हटवताना जी संविधानीक प्रकिया करायला हवी होती. ती केली नसल्याचा दावा तेथील राजकीय पक्षांनी केला होता. केंद्रायाच्या या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या विविध याचिकांवर एकत्रितरित्या सुनावणी घेण्यात येत आहे.

यामुळे हटवलं ३७० कलम

कलम ३७० हटवण्यामागचं कारण काय? असा प्रश्न कोर्टाने केंद्र सरकारला विचाल्यावर भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कोर्टाला सांगितलं की, पुलवामा हल्ल्यामुळं आम्ही कलम ३७० हटवल. केंद्राकडून करण्यात आलेल्या या दाव्याची चर्चा सुरु झाली आहे. केंद्र सरकारने यापूर्वी देखील हे कलम हटवण्याची विविध कारणं सांगितली आहेत. त्यामुळे आज केंद्राकडून करण्याचा आलेल्या या दाव्याची चर्चा होताना दिसत आहे.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधातील आंदोलन तीव्र; पोलिसांना धक्काबुक्की, ABVP चे ११० कार्यकर्ते ताब्यात

Mumbai-Pune Expressway : 'मिसिंग लिंक' उद्या ३ तास बंद; प्रवासाला निघण्यापूर्वी वाचा महत्त्वाची बातमी

IPL क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप

Government Holiday : मुंबईकरांना दहीहंडीऐवजी रक्षाबंधनला सुट्टी; ऑगस्टअखेरीस मिळणार सलग ३ दिवसांचा ब्रेक

Mumbai : 'लोकलमधील ३ डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवा'; Gen Z, Gen Alpha साठी तेजस्वी घोसाळकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी