राष्ट्रीय

खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी कनिष्ठ न्यायालयांकडे लक्ष हवे

मध्यस्थी केंद्राच्या उद‌्घाटन समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे वाढत आहेत, ज्यांचा निपटारा कनिष्ठ न्यायालयात होऊ शकतो

Swapnil S

नवी दिल्ली : वाढत्या खटल्यांचे ओझे कमी करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी येथे केले. मध्यस्थी केंद्राच्या उद‌्घाटन समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे वाढत आहेत, ज्यांचा निपटारा कनिष्ठ न्यायालयात होऊ शकतो. छोट्या प्रकरणांमध्ये जामीन न मिळाल्याने लोक सर्वोच्च न्यायालयात येत आहेत आणि त्यामुळे तेथे कामाचा दबाव वाढत आहे.

उत्तर प्रदेशबद्दल बोलताना चंद्रचूड म्हणाले की, राज्यात गुंतवणूक वाढत आहे. राज्यात उद्योगधंदे उभारले जाणार असून, त्या दृष्टीने न्यायालयीन क्षेत्राचा विस्तार आणि विश्वास असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. वकील आणि कायदेशीर व्यवसायातील इतरांना तंत्रज्ञानाशी संलग्न होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

काढलं नाही, मीच निघाले! बांगलादेश प्रीमियर लीगमधून बाहेर पडल्यावर रिद्धिमा पाठकचा खुलासा, म्हणाली - ‘माझ्यासाठी देश सर्वप्रथम’

भाजप-काँग्रेस युतीवर देवेंद्र फडणवीसांचा नाराजीचा सूर; म्हणाले, "असे काही घडले असेल तर...

"वाटलेल्या नोटांमुळे 'नोटा'चाही अधिकार गेला" ; राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर व्हिडिओ लाँच

छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा; निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न

'अपघात व्हायची वाट पाहताय का?' अंधेरी स्थानकावर प्रचंड गर्दी; महिनाभराच्या WR ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल, Video व्हायरल