राष्ट्रीय

खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी कनिष्ठ न्यायालयांकडे लक्ष हवे

Swapnil S

नवी दिल्ली : वाढत्या खटल्यांचे ओझे कमी करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी येथे केले. मध्यस्थी केंद्राच्या उद‌्घाटन समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे वाढत आहेत, ज्यांचा निपटारा कनिष्ठ न्यायालयात होऊ शकतो. छोट्या प्रकरणांमध्ये जामीन न मिळाल्याने लोक सर्वोच्च न्यायालयात येत आहेत आणि त्यामुळे तेथे कामाचा दबाव वाढत आहे.

उत्तर प्रदेशबद्दल बोलताना चंद्रचूड म्हणाले की, राज्यात गुंतवणूक वाढत आहे. राज्यात उद्योगधंदे उभारले जाणार असून, त्या दृष्टीने न्यायालयीन क्षेत्राचा विस्तार आणि विश्वास असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. वकील आणि कायदेशीर व्यवसायातील इतरांना तंत्रज्ञानाशी संलग्न होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त