राष्ट्रीय

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना पुन्हा पत्र

साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांना सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील

वृत्तसंस्था

देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पुन्हा एकदा सर्व राज्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. यात त्यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येत गाफील राहू नये, सावध राहावे, अशा सूचना दिल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी गाफील राहू नये आणि परिस्थिती सहजतेने घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांना सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील, जसे आपण आत्तापर्यंत करत आलो आहोत, असे भूषण यांनी पत्रात म्हटले आहे.

काढलं नाही, मीच निघाले! बांगलादेश प्रीमियर लीगमधून बाहेर पडल्यावर रिद्धिमा पाठकचा खुलासा, म्हणाली - ‘माझ्यासाठी देश सर्वप्रथम’

भाजप-काँग्रेस युतीवर देवेंद्र फडणवीसांचा नाराजीचा सूर; म्हणाले, "असे काही घडले असेल तर...

"वाटलेल्या नोटांमुळे 'नोटा'चाही अधिकार गेला" ; राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर व्हिडिओ लाँच

छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा; निवडणुकीच्या प्रचारादरम्यान इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न

'अपघात व्हायची वाट पाहताय का?' अंधेरी स्थानकावर प्रचंड गर्दी; महिनाभराच्या WR ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल, Video व्हायरल