राष्ट्रीय

तांबड्या समुद्रातील संघर्ष मालभाड्याच्या मुळावर

Swapnil S

मुंबई : तांबड्या समुद्रात सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम जागतिक मालवाहतुकीवर होत आहे. या संघर्षामुळे मालवाहतुकीचे भाडे २५ ते ३० टक्क्यांनी वाढण्याची दाट शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्या कंपन्यांना त्याचा फटका बसेल, असा अहवाल ‘इंड-रा’ या पतमान संस्थेने दिला आहे. गेल्या १५ ते २० दिवसात खेळत्या भांडवली खर्चात वाढ झाली. त्यामुळे कृषी, वस्त्रोद्योग क्षेत्राला अधिक पैसे मोजावे लागतील. कंपन्यांच्या कॅश फ्लोवर परिणाम होणार असून त्यांना कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते. लोखंड, पोलाद, वाहन व वाहनांचे सुटे भाग, रसायन व वस्त्रोद्योग आदींना फटका बसू शकतो. तसेच कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो. मध्यम क्षमतेच्या कंपन्यांना मोठे आव्हान पेलावे लागेल. कारण त्यांचा खर्च वाढणार आहे. गेल्या ४५ दिवसांत मालवाहतुकीच्या भाड्यात १५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या भागातून ४० टक्के तेल आयात केले जाते तर निर्यात २४ टक्के होते, असे अहवालात नमूद केले. जगातील बहुतांश मालवाहतूक कंपन्यांनी त्यांची जहाजे ही केप ऑफ गुड होप या मार्गाने नेण्यास सुरुवात केली. त्यामुळे मालवाहतुकीचा खर्च व वेळ वाढला आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस