राष्ट्रीय

वादविवाद संपला, तात्काळ राज्याचा दर्जा द्या : काँग्रेस

अभिषेक सिंघवी यांच्यासह काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना पी. चिदंबरम म्हणाले की, या निकालाने अनेक मुद्द्यांवर निर्णय घेतला आहे

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७० मधील तरतुदी रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय एकमताने कायम ठेवल्याने काँग्रेसने सोमवारी सांगितले की, या विषयावरील वादविवाद संपला आहे. परंतु जम्मू-काश्मीरला त्वरित राज्याचा दर्जा बहाल करण्याची आणि विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी केलीआहे.

अभिषेक सिंघवी यांच्यासह काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना पी. चिदंबरम म्हणाले की, या निकालाने अनेक मुद्द्यांवर निर्णय घेतला आहे, परंतु काही महत्त्वाचे मुद्दे राहून गेले आहेत. या निकालाचा काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे. आम्ही कलम ३७० कसे रद्द केले याच्या निर्णयाशी आदरपूर्वक असहमत आहोत. आम्ही ६ ऑगस्ट २०१९ रोजीच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या ठरावाचा पुनरुच्चार करतो की, कलम ३७० जोपर्यंत संविधानाच्या अनुषंगाने काटेकोरपणे दुरुस्त होत नाही तोपर्यंत त्याचा सन्मान केला जाणे आवश्यक होते. आम्ही विधानसभा निवडणुका घेण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे स्वागत करतो. तथापि, आमचा विश्वास आहे की निवडणुका ताबडतोब घेण्यात याव्यात आणि ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रतीक्षा करण्याचे कोणतेही कारण नाही.

Nepal Floods : पुरात वाहून आलेल्या मृतदेहालाही सोडलं नाही! दागिन्यांवर डल्ला, VIDEO व्हायरल होताच दोघांना बेड्या

घोटगे-सोनवडे घाटमार्गाला केंद्राची अंतिम मंजुरी! कुडाळ-कोल्हापूर अंतर कमी होणार; १३ किलोमीटरच्या मार्गासाठी १३ कोटींचा निधी

गणेशोत्सव भक्तीचा की ध्वनिप्रदूषणाचा? डीजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुणेकरांचा एल्गार

मानखुर्द येथील शाळांना उच्च न्यायालयाचा दिलासा; फौजदारी कारवाईला तात्पुरती स्थगिती

लोकलमधील हिंसाचाराचे खटले जलदगती न्यायालयात चालवावेत