राष्ट्रीय

वोडाफोन-आयडियात आता सरकारचा ४९ टक्के हिस्सा

वोडाफोन-आयडिया कंपनीत सरकारने ४९ टक्के समभाग खरेदी करण्याचे ठरवले आहे. सरकारला देण्यात येणाऱ्या स्पेक्ट्रमची रक्कमेची भरपाई समभागाद्वारे केली जाणार आहे, अशी माहिती एक्स्चेंजला वोडाफोन आयडियाने दिली आहे. सध्या सरकारकडे वोडाफोन-आयडियाचे २२.६० टक्के समभाग आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : वोडाफोन-आयडिया कंपनीत सरकारने ४९ टक्के समभाग खरेदी करण्याचे ठरवले आहे. सरकारला देण्यात येणाऱ्या स्पेक्ट्रमची रक्कमेची भरपाई समभागाद्वारे केली जाणार आहे, अशी माहिती एक्स्चेंजला वोडाफोन आयडियाने दिली आहे. सध्या सरकारकडे वोडाफोन-आयडियाचे २२.६० टक्के समभाग आहेत. आता सरकारला कंपनीचे आणखी ३६,९५० कोटी रुपयांचे समभाग मिळणार आहेत. यानंतरही कंपनीचे नियंत्रण प्रवर्तकांकडे राहणार आहे.

वोडाफोन आयडियाने सांगितले की, दूरसंचार खात्याने २९ मार्च रोजी याबाबतचा आदेश दिला होता. कंपनीला हा आदेश ३० मार्चला मिळाला आहे. ही प्रक्रिया सप्टेंबर २०२१ च्या दूरसंचार सुधारणा पॅकेजअंतर्गत केली जात आहे.

या प्रक्रियेतंर्गत कंपनी येत्या ३० दिवसात ३,६९५ कोटी समभाग जारी करणार आहे. याचे दर्शनी मूल्य १० रुपये असणार आहे. शेअरचा दर गेल्या ९० दिवसांचा किंवा २६ फेब्रुवारी २०२५ च्या १० दिवसांच्या सरासरी दरांवर निश्चित केला जाणार आहे.

शुक्रवारी वोडाफोन आयडियाचा समभाग ६.८१ रुपये होता. गेल्या आठवड्याभरात समभाग १० टक्के घसरला आहे. तर एका वर्षांपासून अधिक काळ हे समभाग ठेवणाऱ्यांना ४८ टक्के नुकसान झाले आहे.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन