राष्ट्रीय

पाश्चिमात्य देशांकडून सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन ;पंतप्रधान नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था

भारत हा कायमच पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्न करत आहे. पाश्चिमात्य देशांकडून सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन होत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माती वाचवा’ अभियानात ते बोलत होते. ते म्हणाले की, “स्वच्छ भारत मिशन, कचऱ्यापासून संपत्ती, सिंगल यूज प्लास्टिक बंदी, गंगा स्वच्छता अभियान आदी सर्व प्रकल्प पर्यावरण संरक्षणासाठी भारताने राबवले आहेत. गेल्या आठ वर्षांत भारतात ज्या योजना सुरू आहेत, त्यात पर्यावरण संरक्षणाचा आग्रह धरला आहे. जगातील विकसित देश हे पृथ्वीवरील संसाधनांचा जास्त वापर करत आहेत. जास्त कार्बन उत्सर्जन हेच देश करत आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने सीडीआरआय व आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा आघाडीच्या निर्माणाचे नेतृत्व केले. २०७०पर्यंत भारताने ‘नेट झीरो’चे लक्ष्य ठेवले आहे.देशातील माती जिवंत ठेवण्यासाठी भारताने सदैव काम केले आहे. माती वाचवायला त्यातील रासायनिक घटक कसे कमी होतील, याकडे लक्ष दिले आहे. मातीत पाण्याचे योग्य प्रमाण राहील, याकडे लक्ष दिले आहे,” असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

वीजचोरांवर AI चा 'सर्जिकल स्ट्राईक'; तीन महिन्यांत २८ हजार वीजचोरीचा पर्दाफाश, २८९ प्रकरणांत फौजदारी गुन्हे दाखल

Mira-Bhayandar : उत्तन-पाली डम्पिंगला हरित लवादाचा दणका; तीन महिन्यांत ९.०९ लाख मेट्रिक टन कचरा हटवा

नांदेड-भोकर महामार्गावर भीषण अपघात; सहा ठार, दहा जण जखमी; भोकर व नांदेड येथे उपचार सुरू

Sindhudurg : पक्षाच्या प्रतिमेला ‘गालबोट’ लावणाऱ्यांची गय नाही! नितेश राणेंचा कार्यकर्त्यांना इशारा

Thane : रखडलेले SRA प्रकल्प आता रडारवर; अकार्यक्षम विकासकांना हटविण्याचे संकेत