Commonwealth Table Tennis Championships 2026 : भारताचे आठ टेबल टेनिसपटू उपांत्य फेरीत 
राष्ट्रीय

Commonwealth Table Tennis Championships 2026 : भारताचे आठ टेबल टेनिसपटू उपांत्य फेरीत

राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत पुरुषांच्या आणि महिलांच्या एकेरी उपउपांत्यपूर्व सामन्यांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत पुरुषांच्या आणि महिलांच्या एकेरी उपउपांत्यपूर्व सामन्यांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

दिल्लीतील स्टेडियमवर त्यागराज शनिवारी पार पडलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत सर्वच्या सर्व आठ भारतीय खेळाडूंनी सेमीफायनलमध्ये धडक मारली. महिला विभागात भारतीय खेळाडूंनी एकतर्फी कामगिरी करत चारही सेमीफायनल स्थानांवर कब्जा मिळवला, ज्यामुळे भारताची सर्व पदके निश्चित झाली आहेत.

अव्वल मानांकित मानुष शाहने ऑस्ट्रेलियाच्या आदित्य सरीनचा ६ गेमच्या लढतीत ११-६, ११-८, २-११, १३-१५, ११-८, ११-५ असा पराभव केला. पायाश जैनने हरमीत देसाईचा ८-११, १२-१०, १२-१४, १२-१०, ११-६, ११-९ असा पराभव केला. अंकुर भट्टाचार्यने ऑस्ट्रेलियाच्या निकोलस वेंग झेंग ल्युमचा ७-११, १५-१३, १०-१२, ११-५, ११-९, ११-९ असा पराभव केला, तर मानव ठक्करने इंग्लंडच्या कॉनर अलेक्झांडर ग्रीनवर ५-११, ११-८, १३-११, ११-८, ११-६ अशी मात केली.

तत्पूर्वी, महिला विभागात सिंड्रेला दासने दिवसभरातील सर्वात मोठा धक्कादायक निकाल नोंदवला. तिने पहिल्या गेममधील पराभवानंतर पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाच्या अव्वल मानांकित यांगझी ल्यू हिला १०-१२, ११-९, १२-१०, ११-८, ७-११, ११-८ असे नमवले. दुसऱ्या मानांकित श्रीजा अकुलाने इंग्लंडच्या टिन-टिन हो हिचा १३-११, ११-४, ११-९, १२-१० असा पराभव केला. यशस्विनी घोरपडेने ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टंटिना सिहोगिओसचा ४-० असा धुव्वा उडवला, तर सुतीर्था मुखर्जीने ऑस्ट्रेलियाच्या मिन ह्यंग जी हिचा ४-१ असा पराभव करत भारताची विजयी घोडदौड पूर्ण केली.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI शुल्कावर GST? पात्र व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भार

कृषी उत्पन्न बाजार समित्या रोजगारनिर्मितीचे केंद्र बनवणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

Thane : शासकीय रुग्णवाहिकांची डिझेलसाठीची धावपळ थांबणार! 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्डमुळे इंधनाची अडचण दूर होणार