राष्ट्रीय

भारतीय विद्यार्थी कॅनडापासून दूर ;तणावामुळे पर्यायांचा शोध सुरू

कॅनडातील विद्यापीठांत यापूर्वी प्रवेश मिळालेले अनेक विद्यार्थीही आता तेथे जाण्यास तयार नाहीत

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडात निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम शिक्षण क्षेत्रावरही पडला आहे. कॅनडात द्वेषभावनेपोटी हल्ले होण्याची भीती वाटत असल्याने भारतीय विद्यार्थी कॅनडापासून दूर जात आहेत. आता त्यांनी कॅनडाऐवजी अन्य देशांतील शिक्षण संस्थांचा पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे.

दरवर्षी भारतातून कॅनडा, अमेरिका, युरोपीय देश, ऑस्ट्रेलिया आदी ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी जात असतात. या देशांनाही भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणशुल्काच्या माध्यमातून बरीच कमाई होत असते. पण आता कॅनडा-भारतातील राजनैतिक तणावाचा त्यावर परिणाम झालेला दिसतो. अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी यंदा कॅनडात जाण्यात अस्थिरता आणि भीती वाटत असल्याने अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया असे पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. कॅनडातील विद्यापीठांत यापूर्वी प्रवेश मिळालेले अनेक विद्यार्थीही आता तेथे जाण्यास तयार नाहीत. ते प्रवेश रद्द करून अन्यत्र जाण्याची तयारी करत आहेत. इतकेच नव्हे, तर लग्नसमारंभ आणि व्यापारी परिषदांनिमित्त कॅनडाला जाणारे प्रवासीही आता त्यांचे नियोजित दौरे रद्द करताना दिसत आहेत.

UPI शुल्कावर GST? पात्र व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भार

कृषी उत्पन्न बाजार समित्या रोजगारनिर्मितीचे केंद्र बनवणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

Thane : शासकीय रुग्णवाहिकांची डिझेलसाठीची धावपळ थांबणार! 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्डमुळे इंधनाची अडचण दूर होणार