राष्ट्रीय

मोहन यादव मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री ओबीसी चेहरा देण्याची खेळी : भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय

उज्जैन दक्षिण मतदारसंघातून निवडून आलेल्या यादव यांच्या नावावर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : मध्य प्रदेशात दणदणीत बहुमत मिळवल्यानंतर सात दिवसांनी राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा प्रश्न सुटला आहे. मोहन यादव यांची मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे, तर राज्याला दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले आहेत. जगदीश देवडा आणि राजेश शुक्ला यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना विधानसभा अध्यक्ष करण्यात आले आहे.

उज्जैन दक्षिण मतदारसंघातून निवडून आलेल्या यादव यांच्या नावावर भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही त्यांना पाठिंबा आहे. उज्जैनमधून तीन वेळा निवडून आलेले यादव यांची निवड मुख्यमंत्रीपदी झाल्यावर शिवराजसिंह चौहान यांचे राजकारणातील स्थान कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, शिवराजसिंह चौहान यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल मंगूभाई पटेल यांच्याकडे सुपूर्द केला.

विद्यार्थीदशेतून राजकारणाला यादव यांनी प्रारंभ केला. अ.भा.वि.प.मध्ये काम केल्यानंतर २०१३ मध्ये ते पहिल्यांदा आमदार बनले. त्यानंतर २०१८ मध्ये ते पुन्हा निवडून आले. २ जुलै २०२० मध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांचे राजकारणातील स्थान भक्कम झाले. यंदाच्या निवडणुकीत मोहन यादव यांनी काँग्रेसचे उमेदवार चेतन प्रेमनारायण यादव यांचा १२,९४१ मतांनी पराभव केला.

जबाबदारी योग्यरीत्या पार पाडेन

मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्यानंतर मोहन यादव म्हणाले की, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. राज्य आणि केंद्रातील नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबाबत धन्यवाद. तुमचे प्रेम आणि पाठिंब्याने मी माझी जबाबदारी योग्यरीत्या निभावण्याचा प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले.

VIP गेट तोडून दिल्ली विधानसभेत प्रवेश केलेल्या सरबजीत सिंगला अटक; पोलिस तपासात कारण उघड, म्हणाला...

वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात झुरळ; सोशल मीडियावर Video व्हायरल, IRCTCकडून केटरिंग कंत्राटदाराला १० लाखांचा दंड

ऊर्जा सुरक्षा सुनिश्चिततेसाठी वचनबद्धतेचा सरकारचा दावा; तणाव कमी करण्याचे, संयम राखण्याचे केंद्राचे आवाहन

Mumbai : अखेर प्रतीक्षा संपली! मेट्रो लाईन २बी आणि ९चा शुभारंभ; दहिसर-काशीगाव मार्गावर सेवा सुरु, जाणून घ्या वेळापत्रक

ठाणेकरांना पाण्याची अजिबात चिंता नको! धरणात पुरेसा पाणीसाठा; महापालिकेची माहिती