राष्ट्रीय

...आणि त्या दोघींनी एकमेकींना मिठी मारली

रामजन्मभूमी आंदोलनातील ते सगळे क्षण त्यांच्या डोळ्यासमोरून तरळून गेले असतील.

Swapnil S

सोमवारी अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने हे विखुरलेले नेते एकत्र आले, त्यावेळी वातावरण भावनिक होणं स्वाभाविक आहे. ९० च्या दशकात राम मंदिर आंदोलनाने संपूर्ण देशात जोर पकडला होता. त्यावेळी दोन महिला नेत्यांची खूप चर्चा होती. लालकृष्ण अडवाणींसोबत त्या सुद्धा आघाडीवर राहून राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करत होत्या. त्यांच्या शब्दांनी हजारो, लाखो रामभक्तांमध्ये चेतना निर्माण केली. त्यांच्या भाषणांनी कारसेवकांमध्ये जोश संचारायचा. भाजप नेत्या उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा या दोन महिला नेत्या या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आल्या. त्यावेळी त्याही खूप भावुक झाल्या होत्या. दोघींनी एकमेकींना मिठी मारली. त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. कारण रामजन्मभूमी आंदोलनातील ते सगळे क्षण त्यांच्या डोळ्यासमोरून तरळून गेले असतील. इतक्या मोठ्या संघर्षानंतर आज हे भव्य मंदिर उभं राहिलंय. त्यामुळे दोघी भावनिक होणं स्वाभाविक आहे.

Pune Rain : उकाड्याने हैराण पुणेकरांना पावसाचा दिलासा! शहरातील अनेक भागांत बरसल्या सरी

NEET UG 2026 Re-Exam : उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; गेट बंद होताच गोंधळ

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन