राष्ट्रीय

"औरंगजेब या मातीतला नाही का?"; प्रकाश आंबेडकरांचे विधान

प्रतिनिधी

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराविरोधात काल छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांचे आंदोलन झाले. या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आले. यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून पुढील तपास करत आहेत. यासर्व प्रकरणावर एकीकडे राज्यभर विरोध होत असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

प्रकाश आंबेडकर यावर बोलताना म्हणाले की, "औरंगजेब या मातीतला नाही का? त्याचा जन्म मुघल काळातच झाला होता. त्याचे फोटो लावले म्हणून मला काही नवीन वाटत नाही. ज्यांना हिंदू-मुस्लिम यांच्यामध्ये तेढ निर्माण करायचे आहे, ते या विरोधात बोलत असतील. जाती धर्मावर राजकारण झाले की, प्रादेशिक मुद्दे घेऊन राजकारण करतात," अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान, औरंगजेबाचा फोटो झळकावणाऱ्या तरुणांपैकी ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि रावसाहेब दानवे यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.

"अमेठी आणि रायबरेली दोन्ही माझं कुटूंब..." उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधींची भावनिक पोस्ट

संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

"जाहीर माफी मागा, अन्यथा..."; पॉर्न स्टार म्हटल्यामुळे दुखावलेल्या 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना इशारा

सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर झाले क्रॅश, Video सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! पत्नीनं दिलं गुंगीचं औषध, पतीनं केला बलात्कार...; मुंबईत नेमकं काय घडलं?