राष्ट्रीय

राहुल गांधी यांची 'न्याय यात्रा' झारखंडच्या रामगड येथून पुन्हा सुरू

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' झारखंडच्या रामगड जिल्ह्यातून सोमवारी चौथ्या दिवशी पुन्हा सुरू झाली.

Swapnil S

रामगड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' झारखंडच्या रामगड जिल्ह्यातून सोमवारी चौथ्या दिवशी पुन्हा सुरू झाली. रविवारी जिल्ह्यातील सिद्धू-कान्हू मैदानावर रात्रीचा मुक्काम केल्यानंतर ही यात्रा सोमवारी सकाळी महात्मा गांधी चौकातून पुन्हा निघाली. या दरम्यान राहुल गांधी स्वातंत्र्यसैनिक शहीद शेख भिखारी आणि टिकैत उमरो सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करतील, असे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते राजीव रंजन म्हणाले. रांची जिल्ह्यातील इरबा येथे पोहोचल्यानंतर ते इंदिरा गांधी हातमाग प्रक्रिया मैदानावर विणकरांशी संवाद साधतील, असे ते म्हणाले. दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीनंतर ही यात्रा रांचीच्या शहीद मैदानावर पोहोचेल, जिथे काँग्रेस खासदार जाहीर सभेत ते भाषण करतील. राहुल गांधी रविवारी म्हणाले होते की, त्यांचा पक्ष 'जल-जंगल-जमीन' वर आदिवासींच्या हक्कांसाठी उभा आहे. झारखंडमध्ये अशा वेळी ही यात्रा सुरू आहे जेव्हा जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मागणार आहे. काँग्रेस हा या ठिकाणी आघाडीचा घटक आहे. गांधींचा रात्रीचा मुक्काम सोमवारी खुंटी जिल्ह्यात होणार आहे. ही यात्रा ८०४ किमीचा प्रवास करून दोन टप्प्यांत आठ दिवसांत राज्यातील १३ जिल्ह्यांचा समावेश यात्रेत करणार आहे.

“प्रिय उमर, आम्ही सगळे..."; न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांचे तुरूंगात असलेल्या उमर खालिदसाठी पत्र

"सन्माननीय अध्यक्ष..." म्हणत संजय राऊतांनी राहुल नार्वेकरांचा 'तो' व्हिडिओ केला शेअर

"मशीन तर तू बांगलादेशी असल्याचं सांगतेय..."; UP पोलिसांच्या 'अविष्कार'चा Video व्हायरल

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जर्मनीत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; जीव वाचवण्यासाठी अपार्टमेंटमधून मारली होती उडी

Mumbai : तिकीट मागितलं, थेट CBI चं ओळखपत्र दाखवलं; लोकलच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या तोतयाचं बिंग फुटलं