राष्ट्रीय

राहुल गांधी यांची 'न्याय यात्रा' झारखंडच्या रामगड येथून पुन्हा सुरू

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' झारखंडच्या रामगड जिल्ह्यातून सोमवारी चौथ्या दिवशी पुन्हा सुरू झाली.

Swapnil S

रामगड : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' झारखंडच्या रामगड जिल्ह्यातून सोमवारी चौथ्या दिवशी पुन्हा सुरू झाली. रविवारी जिल्ह्यातील सिद्धू-कान्हू मैदानावर रात्रीचा मुक्काम केल्यानंतर ही यात्रा सोमवारी सकाळी महात्मा गांधी चौकातून पुन्हा निघाली. या दरम्यान राहुल गांधी स्वातंत्र्यसैनिक शहीद शेख भिखारी आणि टिकैत उमरो सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करतील, असे प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते राजीव रंजन म्हणाले. रांची जिल्ह्यातील इरबा येथे पोहोचल्यानंतर ते इंदिरा गांधी हातमाग प्रक्रिया मैदानावर विणकरांशी संवाद साधतील, असे ते म्हणाले. दुपारच्या जेवणाच्या विश्रांतीनंतर ही यात्रा रांचीच्या शहीद मैदानावर पोहोचेल, जिथे काँग्रेस खासदार जाहीर सभेत ते भाषण करतील. राहुल गांधी रविवारी म्हणाले होते की, त्यांचा पक्ष 'जल-जंगल-जमीन' वर आदिवासींच्या हक्कांसाठी उभा आहे. झारखंडमध्ये अशा वेळी ही यात्रा सुरू आहे जेव्हा जेएमएमच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मागणार आहे. काँग्रेस हा या ठिकाणी आघाडीचा घटक आहे. गांधींचा रात्रीचा मुक्काम सोमवारी खुंटी जिल्ह्यात होणार आहे. ही यात्रा ८०४ किमीचा प्रवास करून दोन टप्प्यांत आठ दिवसांत राज्यातील १३ जिल्ह्यांचा समावेश यात्रेत करणार आहे.

AAPचा मोठा निर्णय! खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून हटवले; भाषणावरही बंदी, नेमकं कारण काय?

Mumbai : मेट्रो ९ आणि २बीसाठी आणखी प्रतीक्षा! उद्घाटन पुढे ढकलले; पॉड टॅक्सी, ठाणे-बोरिवली बोगदा कामालाही विलंब

Mumbai : प्रवाशांना दिलासा! मेट्रो ३ वर नवे प्रवेशद्वार सुरू; 'या' प्रमुख स्थानकांवर सुविधा

Ramayana Teaser : रणबीरचा राम अवतार पाहून चाहते भारावले; आलियानेही केलं कौतुक, म्हणाली - "जगावेगळी गोष्ट"

मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी; कोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी, मच्छीमारांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी झेप