राष्ट्रीय

...तर मुस्लीम पुरुष दुसरे लग्न करू शकत नाही

एका मुस्लीम व्यक्तीने दाखल केलेली याचिका फेटाळताना न्यायालायने हे निष्कर्ष नोंदवले.

वृत्तसंस्था

मुस्लीम व्यक्ती आपल्या पत्नी, मुलांचा सांभाळ करण्यास सक्षम नसेल, तर ‘कुराण’नुसार तो दुसरे लग्न करू शकत नाही, अशी टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केली आहे.

‘कुराण’नुसार एखादी व्यक्ती अनाथांना न्याय देत नाही, तोपर्यंत दुसरे लग्न पवित्र होऊ शकत नाही. एका मुस्लीम व्यक्तीने दाखल केलेली याचिका फेटाळताना न्यायालायने हे निष्कर्ष नोंदवले.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्या. सूर्य प्रकाश केसरवानी आणि राजेंद्र कुमार-चतुर्थ यांनी सांगितले की, “कुराणमधील आदेश सर्व पुरुषांना अनिवार्य आहे, ज्यामध्ये मुस्लीम पुरुषांना अनाथांना योग्य वागणूक देण्यास सांगितले आहे. पुरुष आपल्या आवडीच्या दोन, तीन किंवा चार महिलांशी लग्न करू शकतो, पण जर त्या पुरुषाला आपण त्यांना योग्य न्याय देऊ शकणार नाही याची भीती वाटत असेल किंवा आपल्या पहिल्या पत्नी, मुलांचा योग्य सांभाळ करण्यास सक्षम नसेल तर तो दुसरं लग्न करू शकत नाही”.

मुस्लीम व्यक्तीने दुसरे लग्न केल्यानंतर त्याच्या पहिल्या पत्नीला याची माहिती दिली नव्हती. मात्र आपल्याला दोन्ही पत्नींसोबत राहायचे होते, पण पहिल्या पत्नीने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. वैवाहिक हक्क मिळण्यासाठी तिने याचिका दाखल केली होती. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कौटुंबिक न्यायालयाने पतीची याचिका फेटाळली होती. कौटुंबिक न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.उच्च न्यायालयाने पतीची याचिका फेटाळून लावताना सांगितले की, ‘पहिल्या पत्नीपासून आपले दुसरे लग्न लपवणे हा क्रूरपणा आहे. जर पत्नी पतीसोबत राहू इच्छित नसेल, तर वैवाहिक अधिकार मिळवण्यासाठी तिच्यावर एकत्र राहण्यासाठी जबरदस्ती केली जाऊ शकत नाही’.पहिली पत्नी आणि मुलांचा सांभाळ करण्यास सक्षम नसल्यास पतीने दुसरे लग्न करण्यापासून स्वत:ला थांबवायला हवे होते, असेही न्यायालयाने याचिका फेटाळताना नमूद केले.

मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा; आजपासून आचारसंहिता लागू

BMC Election : २२७ जागांसाठी मुंबईत मतदान; महापालिका निवडणुकांची अधिसूचना जाहीर

'नाव बदलणे ही लाजिरवाणी गोष्ट...'; ‘विकसित भारत’च्या नावाखाली MGNREGA च्या नावात बदल केल्याने विरोधक आक्रमक

कल्याणमध्ये रॅपिडो चालकाचा धक्कादायक प्रकार; विनयभंगाच्या प्रकरणानंतर रॅपिडो, ओला आणि उबरवर टांगती तलवार

‘वोट चोर, गद्दी छोड़’ रॅलीवरून संसदेत गोंधळ; दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब, भाजपचा तीव्र आक्षेप