राष्ट्रीय

पुढील हंगामात साखर निर्यातीवर सरकार मर्यादा घालणार

माध्यमातून देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्याचा आणि त्याच वेळी किमती कमी करण्याचा सरकारचा विचार आहे

वृत्तसंस्था

सरकार पुढील हंगामात साखर निर्यातीवर ६०-७० दशलक्ष टनांची मर्यादा घालू शकते. चालू हंगामात १० दशलक्ष टन आहे. साखर निर्यातीवर मर्यादा घालण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. पुढील हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबर असेल.

या माध्यमातून देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्याचा आणि त्याच वेळी किमती कमी करण्याचा सरकारचा विचार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. चालू हंगामाच्या तुलनेत पुढील हंगामात एक तृतीयांश कमी निर्यात होऊ शकते, असे सरकारी आणि उद्योग सूत्रांनी सांगितले.

२४ मे रोजी सरकारने सहा वर्षांत प्रथमच साखरेच्या निर्यातीवर मर्यादा घातली. या वर्षातील विक्रमी निर्यातीमुळे १ ऑक्टोबरपर्यंत साखरेचा साठा ६५ लाख टनांवर येऊ शकतो. वर्षभरापूर्वी ते ८२ लाख टन होता. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी सरकारला किमान आठ दशलक्ष टन साखर निर्यातीस परवानगी देण्याचे आवाहन केले आहे. कारण यावर्षी ३६ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होऊ शकते.

Mumbai : पाणीकपात कायम; १०० टक्के पाणीसाठ्यासाठी आणखी सव्वा लाख दशलक्ष लिटरची गरज

मुंबई ते वाढवण प्रवास वेगवान! उत्तन-विरार सी लिंक आता दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस महामार्गाला जोडण्यास मंजुरी

पावसाने चकवले; एल निनोचे अंदाज फसले, मुंबईत दोन महिन्यांत ८३ टक्के पाऊस

Mumbai : 'आर्किटेक्ट' नाव वापरल्यास कारवाई; कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरची नोटीस

परीक्षांबाबतचे १५८ खटले प्रलंबित