राष्ट्रीय

पुढील हंगामात साखर निर्यातीवर सरकार मर्यादा घालणार

वृत्तसंस्था

सरकार पुढील हंगामात साखर निर्यातीवर ६०-७० दशलक्ष टनांची मर्यादा घालू शकते. चालू हंगामात १० दशलक्ष टन आहे. साखर निर्यातीवर मर्यादा घालण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. पुढील हंगाम ऑक्टोबर ते सप्टेंबर असेल.

या माध्यमातून देशांतर्गत पुरवठा सुरळीत ठेवण्याचा आणि त्याच वेळी किमती कमी करण्याचा सरकारचा विचार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. चालू हंगामाच्या तुलनेत पुढील हंगामात एक तृतीयांश कमी निर्यात होऊ शकते, असे सरकारी आणि उद्योग सूत्रांनी सांगितले.

२४ मे रोजी सरकारने सहा वर्षांत प्रथमच साखरेच्या निर्यातीवर मर्यादा घातली. या वर्षातील विक्रमी निर्यातीमुळे १ ऑक्टोबरपर्यंत साखरेचा साठा ६५ लाख टनांवर येऊ शकतो. वर्षभरापूर्वी ते ८२ लाख टन होता. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (इस्मा) अध्यक्ष आदित्य झुनझुनवाला यांनी सरकारला किमान आठ दशलक्ष टन साखर निर्यातीस परवानगी देण्याचे आवाहन केले आहे. कारण यावर्षी ३६ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होऊ शकते.

"अजितदादा तुम्ही माझी ॲक्टिंग केल्याचं समजलं, पण...", रोहित पवारांचा रडण्याच्या नक्कलेवरून अजित पवारांना टोला

"मी जोरात ओरडले, माझ्या मदतीसाठी कोणीही...", राधिका खेरा यांनी गैरवर्तनाप्रकरणी काँग्रेसवर केले गंभीर आरोप

Video : क्रिकेट खेळताना गुप्तांगाला लागला बॉल, पुण्यातील ११ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

"तो मुलाच्या बर्थडे पार्टीचा प्लॅन करत होता, आता आम्ही त्याच्या अंत्यसंस्काराची योजना आखतोय": पूंछ हल्ल्यातील शहीद जवानाचे नातलग

'ही' परवडणारी कार देते 25 Kmplचं भन्नाट मायलेज! ग्राहकांना लावलंय वेड